Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 11 May, 2011

ममता ते जयललिता... नव्या सत्ताबदलांचे संकेत!

पाच राज्यांतील निवडणुका - निकालपूर्व सर्वेक्षणातील निष्कर्ष
नवी दिल्ली, दि. १० : पाच राज्यांतील मतदान आज पूर्ण होताक्षणीच निकालांचे अंदाज वर्तविणार्‍या सर्वेक्षणांचा अक्षरश: महापूर आला. विविध वृत्तवाहिन्या आणि संस्थांनी केलेल्या सर्वेक्षणाने पश्‍चिम बंगाल आणि केरळसारख्या राज्यात सत्ताबदलाचे स्पष्ट संकेत दिले असून ममता आणि जयललिता यांच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाल्याचे विशेषत्वाने नमूद केले आहे.
बंगालात, केरळात ‘लाल’ किल्ल्याला सुरुंग?
पश्‍चिम बंगालमध्ये गेल्या ३४ वर्षांपासून डाव्यांचे सरकार आपला एकछत्री अंमल ठेवून होते. आता मात्र त्यांच्या या मजबूत ‘लाल’ किल्ल्याला ममता बॅनर्जी नावाच्या तोङ्गेने सुरुंग लावला असून निकालपूर्व सर्वेक्षणांचे जवळपास सर्व निष्कर्ष ममतांच्याच बाजूने जाताना दिसत आहेत. स्टार न्यूज-निल्सन यांच्या सर्वेक्षणानुसार पश्‍चिम बंगालमधील एकूण २९४ जागांपैकी कॉंग्रेस-तृणमूल आघाडीला २२१ तर डाव्यांना ६२ जागा मिळण्याची शक्यता आहे. यावेळी भाजपदेखील बंगालमध्ये खाते उघडण्यात यशस्वी ठरण्याची शक्यता असून त्यांना किमान २ जागा मिळू शकतात. इतर पक्षांना ९ जागा मिळण्याची शक्यता आहे.
आजतक-ओआरजीच्या सर्वेक्षणानुसार, कॉंग्रेस-तृणमूल आघाडीला २१० ते २२०, डाव्यांना ६५ ते ७० जागा मिळू शकतात. यावेळी ममता बॅनजींंना ४८ टक्के पसंतीची मते मिळण्याचा अंदाज या सर्वेक्षणाने वर्तविला आहे. न्यूज २४-चाणक्य यांनीही ममता बॅनर्जी २३० जागा मिळवून दोन तृतीयांश बहुमत अगदी सहज मिळवतील, असा अंदाज वर्तविला आहे.
दरम्यान, केरळमध्ये युडीएङ्गचे पारडे यावेळी जड दिसत असून त्यांना निर्विवाद सत्ता मिळणारच, असे सांगितले जात आहे.
स्टार निल्सनने युडीएङ्गला ८८ तर एलडीएङ्गला ४९ जागा मिळणार असल्याचे म्हटले आहे. आजतक-ओआरजीने युडीएङ्गला ८५ ते ९२, एलडीएङ्गला ४५ ते ५२ जागा मिळणार असा अंदाज वर्तविला आहे. हेडलाईन्स टूडे यांनी युडीएङ्गला ९३ तर एलडीएङ्गला ४४ जागा मिळणार असे म्हटले आहे.
तामिळनाडूत जयललितांचा डंका?
तामिळनाडू या राज्याविषयीचे निष्कर्ष संमिश्र स्वरूपाचे आहेत. या ठिकाणी द्रमुक आणि अण्णाद्रमुक अशी थेट लढत होती. त्यात कुठे द्रमुकचे तर कुठे अण्णाद्रमुकचे पारडे जड दिसत आहे.
या राज्यात एकूण २३४ जागांसाठी मतदान घेण्यात आले. स्टार-निल्सनच्या सर्वेक्षणाने जयललितांना सर्वाधिक पसंतीची मते मिळण्याची शक्यता व्यक्त करीत एकूण १०५ च्या आसपास जागा मिळणार, असे म्हटले आहे. याउलट, सत्ताधारी द्रमुक-कॉंग्रेस आघाडीला ७० जागांवर समाधान मानावे लागले. इतर पक्ष ५९ जागा पटकावतील.
आजतक-ओआरजीने मात्र द्रमुकच्या बाजूने कौल दिला असून त्यांना ११५ ते १३० जागा मिळण्याचा अंदाज वर्तविला आहे. अण्णाद्रमुकला १०५ ते १२० जागा मिळण्याची शक्यता आहे. हेडलाईन्स टूडे यांच्या सर्वेक्षणानुसार, तामिळनाडूमध्ये पुन्हा द्रमुकच सत्तेवर येण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यांच्या मते टूजी स्पेक्ट्रम, कानिमोझीचे त्यात अडकणे याचा कोणताही परिणाम निकालांवर दिसणार नाही.
आसाममध्ये त्रिशंकू अवस्था!
आसाममध्ये मात्र जनता अजूनही संभ्रमात असून तेथे त्रिशंकू विधानसभेची चिन्हे दिसत आहेत. त्या ठिकाणी गोगोई लोकप्रिय असले तरी यावेळी त्यांच्या लोकप्रियतेसोबतच सत्ताधारी कॉंग्रेसला इतर पक्षांची सरकार स्थापनेसाठी मदत घ्यावी लागते की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे.
न्यूज २४-चाणक्य यांनी आसाममध्ये कॉंग्रेसला १२६ पैकी ६०, आसाम गण परिषदेला (आगप) २० तर भाजपला ८ जागा मिळण्याची शक्यता वर्तविली आहे. आाजतक - ओआरजीने कॉंग्रेसला ४१ ते ४७ तर अगगपला ३१ ते ३५ जागा मिळण्याची शक्यता व्यक्त केली आहे. हेडलाईन्स टूडेने कॉंग्रेसला ४४, भाजपला १७ तर आगपला ३३ जागा मिळण्याचा अंदाज वर्तविला आहे. पुडुचेरी या राज्याविषयीचे सर्वेक्षणाचे निष्कर्ष मात्र उपलब्ध झाले नव्हते.

No comments: