Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 30 June, 2011

अपयश झाकण्यासाठीच पोकळ युक्तिवाद : गडकरी

नवी दिल्ली, दि. २९ : आपण ‘कठपुतली’ पंतप्रधान नाही आणि आपले सरकार झोपेतही नाही, हा पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांचा युक्तिवाद आपल्या सरकारचे अपयश झाकण्यासाठीच आहे. देशाला एक विद्वान अर्थतज्ज्ञ असलेली व्यक्ती पंतप्रधानपदी लाभली असतानाही ते स्वत: आणि त्यांच्या नेतृत्वाखालील सरकार महागाई रोखण्यात व भ्रष्टाचाराला आळा घालण्यात अपयशी ठरले आहेत. हे सरकार केवळ तारखाच देत आहे, अशी खरमरीत टीका करीत भाजपाध्यक्ष नितीन गडकरी यांनी, अशा तारखांवर तारखा कितीदा देणार, असा सवाल उपस्थित केला आहे.
या सरकारने आपल्या दोन्ही सत्ताकाळात केलेला भ्रष्टाचारही महागाई हाताबाहेर जाण्यासाठी कारणीभूत ठरला आहे. आपल्या २००९ च्या जाहीरनाम्यात संपुआने महागाई आणि भ्रष्टाचार दोघांवरही अंकुश लावण्याचा निर्धार व्यक्त केला होता. पण, या दोन्ही आघाड्यांवर हे सरकार अपयशी ठरले आहे, असा आरोपही गडकरी यांनी केला. विरोधक सरकारला सहकार्य करीत नाही, हा पंतप्रधानांचा आरोप ङ्गेटाळून लावताना, लोकपालसारख्या महत्त्वाच्या मुद्यावर सरकारनेच विरोधकांना विश्‍वासातच घेतले नाही, असा ठपकाही त्यांनी ठेवला. लोकसभा आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेतेपदावरील व्यक्ती अतिशय महत्त्वाच्या असतानाही संपुआ सरकारने अजूनही लोकपालवर त्यांच्याशी चर्चा केली नाही, असेही गडकरी यांनी सांगितले.

No comments: