Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 27 June, 2011

भ्रष्टाचारी बनले आता अत्याचारी

रामदेवबाबा दिल्लीत कडाडले

नवी दिल्ली, दि. २६
भारत हा लोकशाही देश आहे,असे आपण आत्तापर्यंत मानत आलो आहे. या देशात सत्ताधार्‍यांनी जी दडपशाही चालविली आहे, ती अशोभनीय आहे. देशाची मालमत्ता लुटणारे हे सत्ताधारी नेते आता अत्याचारीही बनले आहेत, अशी घणाघाती टीका योगगुरू रामदेवबाबा यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत केली. मी केंद्र सरकारशी चर्चा करुन तडजोड केली होती, हा केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री कपिल सिब्बल यांचा दावा खोटा आहे. चर्चा झाली होती, तर सिब्बल यांनी त्या चर्चेचे सगळे तपशिल जाहीर करावेत, अशा शब्दांत रामदेवबाबा यांनी कपिल सिब्बल यांना आव्हान दिले..
भ्रष्टाचार विरोधी आंदोलनावर पोलिसांनी केलेल्या लाठीमारात गंभीर जखमी झालेल्या राजबाला हिची दिल्लीच्या हॉस्पिटलमध्ये भेट घेतल्यानंतर रामदेवबाबा यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी बोलताना रामदेवबाबा यांनी सरकारवर टीका केली.
माझे सहकारी आचार्य बालकृष्ण यांचा पासपोर्ट कायदेशीरदृष्या वैध आहे, असा दावा रामदेवबाबांनी केला. पासपोर्ट संदर्भातले सरकारचे सर्व आरोप त्यांनी ङ्गेटाळले. अन्य एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी रामलीला मैदानावरचे भ्रष्टाचार विरोधी आंदोलन चिरडल्याबद्धल केंद्र सरकारचा निषेध केला.
सरकारने मोठा ङ्गौजङ्गाटा घेऊन अपरात्री झोपलेल्या निःशस्त्र आंदोलकांवर लाठीमार केला. त्यावेळी झालेल्या गोंधळात संधी साधून मला मारण्याचा कट होता. अशा परिस्थितीत वेशांतर करुन तिथून पळणे हाच एकमेव योग्य पर्याय होता, असे सांगत रामलीला वरुन निघून जाण्याच्या निर्णयाचे रामदेवबाबांनी समर्थन केले. पोलीस कारवाई अयोग्य आणि अनावश्यक होती, असेही ते म्हणाले. लाठीमार केलाच नाही, असे पोलीस कोर्टाला सांगत आहेत. मात्र लाठीमार झाला नव्हता तर आंदोलक राजबाला गंभीर जखमी कशी झाली, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

No comments: