पणजी, दि. १७ (प्रतिनिधी): पणजी पोलिस स्थानक हल्ला प्रकरणावरील सुनावणी गोव्यात की मुंबईत घेतली जावी, यावर उद्या मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. पोलिस स्थानकावर हल्ला करत पोलिसांवर प्राणघातक हल्ला करून त्यांचा खून करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप राज्याचे शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्यामुळे यावरील सुनावणी ही गोव्यात न घेता मुंबईत कोणत्याही न्यायालयात घेतली जावी, अशी मागणी या प्रकरणाचे तपास करणाचे केंद्रीय गुन्हा अन्वेषणने (सीबीआय) न्यायालयाकडे केली आहे.
बाबूश मोन्सेरात हे राज्यात प्रभावी असल्याने ते या खटल्यातील साक्षीदारांवर दबाव टाकू शकतात. त्यामुळे या खटल्याच्या सुनावणीला बाधा होऊ येऊ शकते. सदर सुनावणीच्यावेळी त्यांनी यापूर्वी अनेक अडचणी निर्माण केलेल्या आहेत, असा दावा करून सीबीआयने मुंबई उच्च न्यायालयात अर्ज सादर केला आहे. त्या अर्जावर उद्या सुनावणी होणार आहे.
Monday 18 April, 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment