कुडचडे,दि. २१ (प्रतिनिधी): ट्रकचालकांच्या मनमानीनंतर सुमारे आठवडाभर बंद ठेवण्यात आलेली खनिज वाहतूक रिवण भागातून पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न केल्याने आज सुमारे १०० पेक्षा जास्त कावरे नागरिकांनी संपूर्ण खाण मालवाहतूक रोखली.
आज सकाळी खाण मालवाहतुकीसाठी माल भरून रांगेत उभ्या असलेल्या ट्रकांना कावरेवासीयांनी अडवून वाहतूक करण्यास मनाई केली. यापूर्वी ट्रक चालकांनी बरीच मनमानी केल्यामुळे ग्रामस्थांच्या मनात उद्रेक झाला होता. त्यामुळे आठवडाभर खाण वाहतूक रोखून ठेवली होती. त्यामुळे मालवाहतूक बंद ठेवण्यात आली होती. आज सदर स्थिती पुन्हा उद्भवल्याने येथील परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता होती. त्यामुळे उपजिल्हाधिकारी आग्नेल फर्नांडिस, मामलेदार सुदिन नातू, उपअधीक्षक रोहिदास पत्रे, पोलिस निरीक्षक सुदेश नार्वेकर, भानुदास देसाई, राजू राऊत घटनास्थळी फौजफाट्यासह दाखल झाले. त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यांनी सर्व ट्रक खाण कंपनीत पुन्हा माघारी पाठवले. त्यामुळे तणाव निवळला.
Friday 22 April, 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment