सावंतवाडी, दि. ३० (प्रतिनिधी) ः सावंतवाडी-बेळगाव-कोल्हापूर जोडणाऱ्या आंबोली घाटात दरड कोसळून या मार्गावरील सर्व वाहतूक ठप्प झाली. अतिवृष्टीमुळे आज संध्याकाळी ५ च्या सुमारास ही घटना घडली. भलेमोठे खडक कोसळल्याने रस्ता खचला आहे. त्यामुळे पंधरा दिवस हा मार्ग वाहतुकीस बंद राहील अशी शक्यता आहे.घटनास्थळी सावंतवाडी पोलिस प्रभारी निरीक्षक अविनाश काळदाते यांच्यासह सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी दाखल झाले आहेत.
आंबोली मुख्य धबधब्यापासून सुमारे २०० मीटर सावंतवाडी-दाणोलीच्या दिशेने ही दरड झाडाशिळांसह कोसळली. उद्या शनिवार, रविवारी या ठिकाणी पर्यटक जाऊ शकणार नाहीत, अशी स्थिती निर्माण झाली आहे.आंबोलीमार्गे जाणाऱ्या सर्व गाड्या फोंडाघाट व दोडामार्गमागे वळविण्यात आल्या आहेत.
Saturday 31 July, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment