Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 26 February, 2009

बंदर कप्तानच 'अपात्र'

राज्याचे विद्यमान बंदर कप्तान ए. पी. मास्कारेन्हास हे (कॅप्टन ऑफ पोर्ट) हे त्या पदास पूर्णपणे अपात्र असून ८९ पासून ते हे पद बळकावून आहेत. सरकारला त्यांच्या अपात्रतेची पूर्ण जाणीव असूनही केवळ आपल्या स्वार्थासाठी सोयीनुसार ते त्यांचा वापर करीत आहेत, असा आरोपही मनोहर पर्रीकर यांनी केला. मास्कोरेन्हास यांच्या हाती गोव्याचा किनारा पूर्णपणे असुरक्षित असून अधिक काळ त्यांना या पदावर राहू दिले तर गोव्याचे काही खरे नाही, असेही ते म्हणाले.
मास्कारेन्हास यांची २५ जानेवारी ७९ रोजी हंगामी तत्त्वावर बंदर कप्तान म्हणून नियुक्ती करण्यात आली. तेव्हा त्यांच्याकडे मर्चंट शिपिंग कायद्यांतर्गत आवश्यक असलेली मास्टर्स पदवी होती. ही पदवी त्यांनी ७७ साली घेतली होती. नंतर ८९ साली ते बंदर कप्तानचे काम सांभाळू लागले. मात्र या कामासाठी त्यांची शैक्षणिक पात्रता पुरेशी नव्हती. कारण ७८ साली बंदर कप्तानच्या शैक्षणिक पात्रतेसंबंधीची आवश्यकता एसटीसीडब्ल्यु ७८ (स्टॅंडर्ड ऑफ ट्रेनिंग सर्टिफिकेशन अँड वॉच कीप) नुसार बदलली होती. भारत सरकारने २८ एप्रिल ८४ साली ती अंगिकारली मात्र मास्कारेन्हास यांनी गरजेनुसार आपली शैक्षणिक पात्रता वाढविली नाही. असे असतानाही ९१ साली तत्कालिन सरकारने त्यांना पूर्णस्वरूपी बंदर कप्तान केले. त्यानंतर आजतागायत गेली अठरा वर्षे बेकायदा ते या पदाचा आणि त्यानुसार येणाऱ्या अनेक सुविधांचा लाभ घेत असल्याचा आरोप पर्रीकर यांनी केला.

No comments: