इस्लामाबाद, दि. २३ : पाकिस्तान आणि तालिबानी यांच्यात शांती समझोता झाला असला तरीही तालिबानी अतिरेक्यांनी एका पाकिस्तानी अधिका-याचे अपहरण केले. दोन खतरनाक अतिरेक्यांची सुटका करुन घेतल्यानंतरच या पाक अधिका-याला तालिबानींनी सोडले.
जिल्हा समन्वय अधिकारी कुशल खान असे या पाक अधिका-याचे नाव आहे. तो आणि त्याच्या सहा सुरक्षारक्षकांचे मिंगोरा येथून रविवारी अपहरण करण्यात आले होते. गेल्याच आठवड्यात पेशावरमध्ये अटक केलेल्या दोन तालिबानी अतिरेक्यांची सोडल्यानंतर पाक अधिका-याला सोडून देण्यात आले, अशी माहिती तालिबानचे प्रवक्ते मुस्लिम खान यांनी दिली.
अलिकडेच पाक सरकार आणि कट्टर तालिबानी यांच्यात शांती करार झाला होता. परंतु आमच्या माणसांना पेशावरमध्ये अटक करुन आणि एकाला दिरमध्ये ठार करुन पाक सरकारने करार मोडला. त्यामुळे आम्हाला अपहरण करावे लागले, असे खान यांनी सांगितले. मात्र तालिबानचा हा दावा पाक सरकार फेटाळत आहे. शांती करार फक्त मलाकंद भागासाठी लागू आहे. पेशावरमध्ये कुणाला तरी अटक केल्याने कराराचा भंग कसा होऊ शकतो, असा उलट सवाल पाक सरकारने केला आहे.
Tuesday 24 February, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment