Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 23 April, 2010

'हिंदू जनजागृती'ची पणजी भव्य सभा

सभेत घेण्यात आलेले काही ठळक ठराव

शाळा व महाविद्यालय तसेच राष्ट्रीय
कार्यक्रमात "वंदे मातरम्' सक्तीचे करावे.
सर्वोच्च न्यायालयाने फाशी ठोठावलेल्या
महंमद अफझल याला त्वरित फाशी द्यावी.
गोहत्या त्वरित बंद करावी.

'तोवर देवस्थान, घुमट्या अनधिकृत ठरवू नयेत'

पणजी, दि. २२ (प्रतिनिधी): शासनाने देवस्थान व घुमट्या अनधिकृत ठरवताना भाविकांच्या भावनांच्या ठिकऱ्या उडवू नयेत. लोकांना विश्वासात घेतल्याशिवाय एकही देवस्थान किंवा घुमटी अनधिकृत ठरवू नये. जनतेच्या धार्मिक भावना जाणून घेण्यासाठी सरकारने राज्य, जिल्हा व तालुका स्तरांवर तीनही धर्माच्या त्रिसदस्यीय समित्या स्थापन कराव्यात, असा ठराव आज हिंदू जनजागृती समितीतर्फे देवस्थानांच्या संरक्षणासाठी घेण्यात आलेल्या सभेत मांडण्यात आला. यावेळी सभेत उपस्थित असलेल्या धर्मभिमानी हिंदूंनी या ठरावाला पाठिंबा दिला. यावेळी व्यासपीठावर "पतंजली योग'चे गोवा प्रभारी डॉ. सुरज काणेकर, धर्मशक्ती सेनेचे महेश मुळीक, रणरागिणीच्या सौ. शुभा सावंत, शिवसेनेचे माजी राज्य प्रमुख रमेश नाईक व हिंदू जनजागृती समितीचे गोवा राज्य प्रवक्ते जयेश थळी उपस्थित होते. या सभेचे आयोजन शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आले होते.
सरकार कायद्याचा बडगा उभारून मंदिरे मोडायला पाहत आहे. गोव्यात आता सात्त्विकता टिकली आहे ती केवळ या मंदिर आणि घुमट्यांमुळे, असे मत यावेळी धर्मशक्ती सेनेचे महेश मुळीक यांनी व्यक्त केले. हिंदूची मंदिरे मोडणारा अफझल खान सरकारच्या रूपाने पुन्हा अवतरला आहे. त्याने ७० टक्के मंदिरे पाडण्याचे काम पूर्ण केले आहे. तर, २० टक्के काम बाकी आहे. ते २० टक्के पूर्ण होण्यापूर्वी प्रत्येक हिंदूच्या घरातून अफझल खानचा वध करणारे छत्रपती शिवाजी महाराज उभे राहिले पाहिजेत, असे आवेशपूर्ण उद्गार त्यांनी यावेळी काढले. हिंदू भडकला तेव्हा तेव्हा भगवा भडकला आहे असून म्हणून प्रत्येक मंदिरातून धर्म शिक्षण द्यायला पाहिजे, असे श्री. मुळीक म्हणाले.
मुले बिघडलीत म्हणून मुलांना दोष घेऊ नका. त्यांना घडवायला आम्हाला अपयश आले आहे, याचा विचार कारा, असा सल्ला यावेळी "पतंजली योग'चे डॉ. सुरज काणेकर यांनी सभेत बोलताना दिला. २०२० साली भारत जगद्गुरू बनणार आहे. त्यासाठी भारत स्वाभिमान ट्रस्टचे सदस्यत्व प्राप्त करा. यानंतर अशा प्रकारची सभा घ्यावी लागणार नसल्याचे डॉ. काणेकर पुढे म्हणाले.
या देशातील हिंदू हा उपरा झालेला आहे. भक्तीचे सर्व मार्ग हे देवाकडे जातात हे सत्य नसल्याचा दावा यावेळी रमेश नाईक यांनी बोलताना केला. केंद्रातील सरकारने या देशातील लष्कर निष्क्रिय करून टाकले आहे, असा आरोपही त्यांनी यावेळी केला. यावेळी "रणरागिणी'च्या शुभा सावंत यांनी आपले मत व्यक्त केले.
यावेळी जुगाराच्या विरुद्ध लढा देणाऱ्या "मांद्रे सिटीझन फोरम'चे अध्यक्ष सुधीर सावंत, दैनिक सनातन प्रभातचे प्रतिनिधी विवेक पेंडसे, मंदिर संरक्षण समितीचे पदाधिकारी आनंद प्रभुदेसाई, पतंजली योग शिक्षक विश्वास कोरगावकर यांचा यावेळी जाहीर सत्कार करण्यात आला. सभेला मोठ्या संख्येने धर्माभिमानी उपस्थित होते. "वंदे मातरम्'ने सभेची सांगता झाली.

No comments: