Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 14 April, 2009

...तर पाकमध्ये सैन्य घुसवणार राजनाथसिंग यांची ग्वाही

नवी दिल्ली, दि. १३ : भाजप सत्तेवर आल्यास आंतराष्ट्रीय मान्यतेनंतर पाकिस्तानमध्ये सैन्य घुसवून तेथील दहशतवाद्यांचे तळ उद्वस्त करू, अशी आक्रमक भूमिका आज भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष राजनाथसिंग यांनी घेतली.
पाकिस्तानमधील दहशतवाद संपुष्टात आणण्यासाठी भारतीय लष्कराची गरज आहे का, अशी विचारणा भाजप त्या देशाला करील, त्या देशाने होकार दिला नाही, तर आंतराष्ट्रीय समुदायाशी संपर्क साधून भारतीय सेना त्या देशात पाठविली जाईल, असे त्यांनी बिहारमध्ये आयरू या गावात बोलताना सांगितले. पाकने आपल्या देशातील दहशतवाद स्वतःहून संपुष्टात आणावा, अशी भाजपची अपेक्षा आहे असे त्यांनी स्पष्ट केले. विद्यमान सरकार दहशतवादाला सामोरे जाण्यास असमर्थ असल्याचे मुंबईतील घटनेने दाखवून दिले आहे, अशी टीका त्यांनी केली. देशांतर्गत सुरक्षेबाबत जनतेच्या मनात विश्वास निर्माण करण्यात मनमोहन सिंग सरकार अपयशी ठरल्याचे त्यांनी सांगितले. सीमेचे रक्षण आणि जनतेला सुरक्षा याबाबत भाजपने स्पष्ट शब्दांत ग्वाही दिली आहे. याबाबत पोखरण-२ आणि कारगिल ही उदाहरणे देशासमोर आहेत, असे सिंग यांनी सांगितले.

No comments: