मुंबई, दि.२० - मालेगाव बॉम्बस्फोटाच्या आरोपात अटक केलेल्या आरोपींवर मोक्कानुसार खटला चालवला जाणार आहे. एटीएसचे प्रमुख हेमंत करकरे यांनी सांगितले की आरोपींच्या विरोधात मोक्काचे कलम तीन (अपराधिक षड्यंत्र)नुसार खटला दाखल करण्यात आला आहे.
यानुसार सर्व दहा आरोपींच्या विरोधात एटीएसला १८० दिवसांच्या आत चार्जशीट दाखल करावी लागणार आहे. या दिवसांमध्ये सर्व आरोपींना जमानत मिळू शकणार नाही. मालेगाव स्फोटांच्या आरोपात एटीएसने साध्वी प्रज्ञा ठाकूर सह दहा जणांना अटक केली आहे. याप्रकरणी एटीएस प्रमुखांनी सांगितले की त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा राजकीय दबाव नाही. तसेच एटीएसने शारीरिक छळ केल्याचा आरोप काही आरोपींना केला असला तरी त्यात काही तथ्य नाही आणि न्यायालयानेही ते मान्य केले असल्याचे त्यांनी सांगितले.
एटीएसच्या विरोधात याचिका
शिवसेनेच्या एका कार्यकर्ताने आज एटीएसच्या विरोधात मुंबई न्यायालयात याचिका दाखल केली. याचिकेमध्ये मालेगाव स्फोट प्रकरणी तपास राज्य सीआयडीकडून करण्यात यावे आणि आरोपी साध्वी प्रज्ञा ठाकूर यांना दिली जाणारी वाईट वागणूक याबाबत एटीएसच्या विरोधात कारवाई केली जावी असे यात म्हटले आहे.
Friday 21 November, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment