पणजी, दि. १७ (प्रतिनिधी): राज्याच्या बऱ्याच भागात आज दुपारपासून अचानकपणे पावसाने हजेरी लावल्यामुळे लोकांची तारांबळ उडाली. आंध्र प्रदेशातील रायलसीमा क्षेत्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने गोव्यात पावसाच्या सरी कोसळल्याचे पणजी वेधशाळेचे प्रमुख के.व्ही. सिंग यांनी सांगितले. बंगालच्या खाडीत चक्रीवादळ निर्माण झाले होते. त्याच्या प्रभावाने हा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला.
गोवा आणि कर्नाटकाच्या किनारपट्टीच्या क्षेत्रात पावसाने हजेरी लावली. येत्या चोवीस तासात राज्यात काही ठिकाणी तुरळक पाऊस व गडगडाट होण्याची शक्यता श्री.सिंग यांनी व्यक्त केली आहे. उकाड्याने हैराण झालेल्या लोकांना या पावसाच्या शिडकाव्याने चांगलाच दिलासा मिळाला. हवेत सुखद गारवा जाणवत होता.
Tuesday 18 November, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment