Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 28 January, 2011

तिरंगा मुद्यावर भाजप कोर्टात जाणार
नवी दिल्ली, दि. २७ : जम्मू-काश्मीरच्या श्रीनगर येथील लाल चौकात तिरंगा ङ्गडकविण्याच्या भाजपाच्या प्रयत्नांमध्ये आडकाठी आणण्याच्या राज्य सरकार आणि केंद्रातील संपुआ सरकारच्या घटनाबाह्य आणि बेकायदेशीर भूमिकेच्या विरोधात न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय भाजपने आज जाहीर केला. तिरंगा ङ्गडकविण्यासाठी निघालेल्या एकता यात्रेचे नेतृत्व करताना अटक झालेल्या सुषमा स्वराज, अरुण जेटली आणि अनंतकुमार यांचा भव्य सत्कार करण्यासाठी आयोजित कार्यक्रमात अडवाणी बोलत होते.
काळ्या पैशाबाबत कोर्टाची विचारणा
नवी दिल्ली, दि. २७ : विदेशी बँकांमध्ये भारतीयांनी ठेवलेला काळा पैसा हा संरक्षण सौदा, मादक द्रव्याची तस्करी आणि शस्त्रास्त्र तस्करीतून आलेला असावा, अशी शक्यता वर्तविणार्‍या वृत्तांवर गंभीर चिंता व्यक्त करून सर्वोच्च न्यायालयाने आज केंद्र सरकारला या काळ्या पैशाचा नेमका स्रोत कोणता, तसेच विदेशी बँकांमध्ये खाते असणार्‍या व्यक्ती आणि संस्थांविरुद्ध कोणती कारवाई केली, अशी विचारणा केली.
थॉमस यांच्यावरील आरोपांविषयी केंद्र अनभिज्ञ
नवी दिल्ली, दि. २७ : केंद्रीय दक्षता आयुक्त पी. जे. थॉमस यांच्याविरोधात भ्रष्टाचारप्रकरणी आरोपपत्र दाखल असल्याची आणि त्यांच्याविरोधात खटला भरण्यासाठी केरळ सरकारने मंजुरी दिली असल्याची माहिती केंद्रीय दक्षता आयुक्त पदावरील व्यक्तीची निवड करणार्‍या उच्चाधिकार समितीला नव्हती, असे शपथपत्र केंद्र सरकारतर्ङ्गे आज सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, या समितीवर सदस्य असलेल्या भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांनी, सरकारचे हे शपथपत्र सपशेल खोटे असल्याचा दावा करीत, सरकारचा खोटारडेपणा उघड करणारे वेगळे शपथपत्र आपण दाखल करणार असल्याचे जाहीर केले.
इंधन भेसळीवर नियंत्रण आणणार
नवी दिल्ली, दि. २७ : भेसळखोरांविरुद्ध केंद्र सरकार आक्रमक झाले असून इंधन भेसळीवर सहा महिन्यात नियंत्रण आणणार असल्याचे केंद्रीय पेट्रोलियम मंत्री एस. जयपाल रेड्डी यांनी म्हटले आहे. इंधन भेेसळीविरोधात कडक पावले उचलण्यासाठी सर्व राज्य सरकारांनी स्वत: पुढाकार घ्यायला हवा. केंद्र सरकारही आपल्याकडून यासंदर्भात काही उपाययोजना करणारच आहे,असे रेड्डी यांनी सांगितले.

No comments: