Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 25 January, 2011

जेटली, स्वराज यांना जम्मूत रोखले

विमानतळावरच धरणे, भाजप कार्यकर्त्यांची जोरदार नारेबाजी
नवी दिल्ली, दि. २४ : जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमधील लाल चौकात येत्या प्रजासत्ताक दिनी ‘तिरंगा’ ङ्गडविण्यासाठी निघालेली भाजपाची एकता यात्रा सीमेवरच रोखण्यासाठी राज्य सरकारने सीमा सील करून सशस्त्र दलांचा तगडा पहारा बसविला असतानाच, ‘तिरंग्या’ची सूत्रे स्वीकारण्यासाठी लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते अरुण जेटली तसेच पक्षाचे वरिष्ठ नेते अनंतकुमार यांनी श्रीनगरकडे कूच केली. तथापि, त्यांनाही जम्मू विमानतळावरच अडविण्यात आले.
रविवारी भाजपाचे शेकडो कार्यकर्त्यांना सीमेवरच रोखून त्यांना काश्मिरात प्रवेशबंदी करण्यात आली होती. अनेक कार्यकर्त्यांना अटकही करण्यात आली. याच अनुषंगाने हे नेते एकता यात्रेची पुढील सूत्रे सांभाळण्यासाठी निघाले. तथापि, जम्मू विमानतळावरच त्यांना अडविण्यात आले आणि शहरात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली. विमानतळावरूनच या नेत्यांना दिल्लीला परत जाण्यास सांगण्यात आले. तथापि, या नेत्यांनी परत जाण्यास नकार दिला. यावेळी विमानतळाबाहेर उपस्थित असलेल्या शेकडो भाजपा कार्यकर्त्यांनी हातात तिरंगा ङ्गडकवित सरकारविरोधात जोरदार घोषणा दिल्या.
केंद्र आणि राज्य सरकारच्या राष्ट्रविरोधी धोरणांचा निषेध करीत जेटली, स्वराज आणि अनंतकुमार यांनी विमानतळावरच धरणे दिले. जम्मू-काश्मिरातील स्थिती आज अतिशय भयानक झालेली आहे. आणिबाणीसदृश्य स्थिती निर्माण करण्यात आली आहे. आम्ही भारताचे नागरिक आहोत. या देशाच्या कोणत्याही भागात जाण्याच आम्हाला स्वातंत्र आहे. पण, आमच्या या स्वातंत्र्यावर गदा आणण्यात येत आहे, असा आरोप यावेळी अनंतकुमार यांनी केला.
‘‘भारतात कुठेही तिरंगा ङ्गडकविण्याचा अधिकार प्रत्येक नागरिकाला असताना श्रीनगरात तिरंगा ङ्गडकविण्यामुळे देशाचे विभाजन होईल, असा विचार पंतप्रधान कसा करू शकतात,’’ असा सवाल जेटली यांनी यावेळी केला.
दरम्यान, नवी दिल्लीत भाजपाचे प्रवक्ते रविशंकर प्रसाद यांनीही केंद्र व राज्य सरकारच्या धोरणाचा निषेध केला. नागरिकांना आज आपल्या देशात मुक्तपणे वावरू दिले जात नाही. याचा आम्ही तीव्र धिक्कार करतो, असे त्यांनी सांगितले. केंद्र आणि राज्य शासनाने कितीही प्रयत्न केले तरी लाल चौकात तिरंगा ङ्गडकविण्याचा आमचा निर्धार कायम राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
देशद्रोह्यांना राजेशाही वागणूक अन् देशभक्तांचा छळ!
केंद्राच्या धोरणाचा गडकरींकडून निषेध

भाजपाची एकता यात्रा सीमेवरच अडविण्याच्या जम्मू-काश्मीर आणि केंद्रातील संपुआ सरकारच्या कारवाईचा भाजपाध्यक्ष नितीन गडकरी यांनी निषेध केला. या देशात देशद्रोह्याना राजेशाही वागणूक दिली जाते आणि देशभक्तांचा छळ केला जात आहे, असा आरोप गडकरी यांनी यावेळी केला.
आपल्या पक्षाची एकता यात्रा थांबविल्यामुळे काश्मिरात दहशतवादी शक्तींना आणखी बळ मिळेल आणि दहशतवाद वाढेल, असा इशाराही गडकरी यांनी दिला. देशाच्या कोणत्याही भागात राष्ट्रध्वज ङ्गडकविण्याचे स्वातंत्र्य या देशातील प्रत्येक नागरिकाला असताना जणू, श्रीनगर हे भारताचे अंग नसल्याप्रमाणे आम्हाला तिथे तिरंगा ङ्गडकविण्यापासून रोखले जात आहे, अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला.
दरम्यान, पाच दिवसांच्या चीन दौर्‍यावर असलेले गडकरी यांचे आज र्गांगझू येथे आगमन झाले. तिथूनच त्यांनी भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष अनुराग ठाकूर यांच्याशी ङ्गोनवरून चर्चा केली आणि केंद्र व राज्य सरकारतर्ङ्गे आणण्यात येत असलेल्या अडथळ्यांविषयी माहिती जाणून घेतली. भाजपाची एकता यात्रा रोखून केंद्र सरकारने दहशतवाद्यांना त्यांच्यासाठी सारा देश मोकळे असल्याचे संकेतच दिले आहेत. यामुळे राज्यातील आणि देशातील दहशतवादी कारवायांमध्ये आणखीच वाढ होईल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.
आता राष्ट्रपतींनीच हस्तक्षेप करावा!
भाजपाची एकता यात्रा थांबविल्यानंतर अरुण जेटली, सुषमा स्वराज यासारख्या वरिष्ठ नेत्यांनाही अडविण्यात आल्यानंतर भाजपाने राष्ट्रपतीा प्रतिभा पाटील यांच्याकडे धाव घेतली असून, ‘आता राष्ट्रपतीनीच आता या प्रकरणी हस्तक्षेप करावा,’ अशी विनंती केली आहे.
‘आमच्या तीन वरिष्ठ नेत्यांना जम्मू विमानतळावर अडविण्यात आले आहे. ही स्थिती अतिशय गंभीर आहे. त्यामुळे या प्रकरणात आता आपल्या हस्तक्षेप करण्याची नितांत गरज आहे,’ असे पक्षाचे ज्येष्ठ नेते राजनाथसिंग यांनी राष्ट्रपतींना ङ्गोनवरून कळविले.
हा देश आपला आहे. या देशात कुठेही राष्ट्रध्वज ङ्गडकविण्याचा देशवासियांना अधिकार असल्याने आपणच आता केंद्र सरकारशी बोला आणि भाजयुमोला श्रीनगरमधील लाल चौकात तिरंगा ङ्गडकविण्याची परवानगी द्या, अशी विनंती आपण राष्ट्रपतींनाा केली असल्याचे राजनाथसिंग यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
जम्मू-काश्मीर सीमेवर पाच हजार जवान तैनात
येत्या २६ जानेवारी रोजी श्रीनगरमधील लाल चौकात तिरंगा ङ्गडकविण्याच्या आपल्या योजनेवर भाजयुमो व भाजपा ठाम असल्याने जम्मू-काश्मीर व पंजाबच्या सीमेवर ५ हजार सुरक्षा जवान तैनात करण्यात आले आहेत. भाजयुमोच्या कार्यकर्त्यांना जम्मू-काश्मीरच्या सीमेत घुसू न देण्यासाठी ही सीमाच सील करण्यात आली आहे, असे एका वरिष्ठ पोलिस अधिकार्‍याने आज पीटीआयला सांगितले. पंजाबमधून जम्मूत जाण्यासाठी जी सात प्रवेशाची ठिकाणे आहेत ती सील करण्यात आली आहेत. राष्ट्रीय एकता यात्रा लखनपूर येथे पोहोचली आहे. यात्रेत युवती व महिलांचा सहभाग राहील हे लक्षात घेऊन महिला पोलिसांच्याही दोन पलटणी तैनात करण्यात आल्या आहेत. दंगाविरोधी वाहने, वॉटर कॅनन याबरोबरच कंेंद्रीय राखीव पोलिस दलाचे जवानही तैनात करण्यात आले असून त्यांना सावध राहण्यास सांगण्यात आले आहे.

No comments: