Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 10 August, 2010

लेनचा चरित्रात जोडलेल्या बाबींवर भर

दादाजी नरसप्रभु देशभांडे, रोहिरखोरे यांना १७ एप्रिल १६४५ साली लिहिलेल्या पत्रात शिवाजीराजे लिहितात "श्री रोहिरेश्वर खोरियातील तुमचे आदिकुलदेव. तुमचा डोंगरमाथा पठारावरील शेन्द्रीलगत स्वयंभू आहे. त्यांनी आम्हांस यश दिले व पुढे तो सर्व मनोरथ हिन्दवी स्वराज्य करून पुरविणार आहे... हे राज्य व्हावे हे श्रींचे मनात फार आहे. (शि.पत्र सार संग्रह खं १ पृ १०८ पत्र क्र.५०४) अगदी पहिल्या दिवसापासून महाराजांचे हिन्दवी स्वराज्य होते.
आपल्या आयुष्यातील ध्येयाची इतकी सुस्पष्टता, त्या विषयीचा निर्धार आणि त्याला ईश्वरी कृपेचे पाठबळ आहेच याची शाश्वती केवळ १७-१८ व्या वर्षी असलेल्या तरुण शिवाजीने काय Pusedosecular राज्य स्थापन करण्याची ईर्षा बाळगली होती? एकनाथांच्यापासून महाराष्ट्रातील संतमहात्मे देवतांना "बया दार उघड' असे साकडे घालत होते. हिन्दूंचे जिणे मुसलमानी अंमलाखाली दुष्कर झाले होते. तेव्हा त्याचे रक्षण करणे, त्यांना अभय देणे हे जर महाराजांचे अगदी पहिल्या दिवसापासूनचे धोरण असेल तर त्यात वावगे काय होते? शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीचे मोजक्याच पण अत्यंत योग्य शब्दांत वर्णन महाकवी भूषणाने केले. काशी, मथुरा इत्यादी ठिकाणी देवळांच्या जागी मशिदी तयार झाल्यास "शिवाजी न होता तो सुनती होती सबकी' हे धार्मिक विधानच आहे. स्वराज्याची स्थापना झाल्यावर थोडा निवांतपणा आणि जीवन सुसह्य होण्याची स्थिती आल्यावर समर्थांनी जे वर्णन केले ते नाकारणारे फक्त आजचे Psuedosecularist असतील कारण त्यांना मुसलमानांची मते पाहिजे आहेत.
समर्थ म्हणतात "बुडाला औरंग्या पापी! म्लेंच्छ संहार जाहला। मोडीली मांडिली क्षेत्रे। आनंदवन भुवनी।।' या ओवीत म्लेंच्छ या शब्दाचा अर्थ जे मुस्लीम आपल्याशिवाय इतरांना काफिर ठरवून एकतर धर्मांतराचा किंवा शिरच्छेदाचाच पर्याय देण्याची मानसिकता ठेवतात असाच आहे.
शिवचरित्राचे उदात्तीकरण करतात त्यात समाविष्ट झालेल्या शिवाजी महाराजांच्या बालपणातील घटनेचा उल्लेख लेन करतो. ते विजापूरला शहाजी राजांबरोबर गेले असता गाईचा वध करणाऱ्या एका खाटिकाचा त्यांनी हात कापल्याची ती गोष्ट आहे. ही गोष्ट आधुनिक इतिहासकारांनी त्यांच्या लेखनात समाविष्ट केलेली नसते. कोणत्याही मोठ्या चरित्रनायकाच्या नंतर लिहिल्या गेलेल्या मनोरंजक चरित्रामधून अशा कथा प्रसृत होतात.
जे स्थान शिवाजी महाराजांचे भारतात आहे, लेनच्या अमेरिकेत तेच स्थान अमेरिकेचे स्वातंत्र्यसेनानी व संस्थापक अध्यक्ष जॉर्ज वाशिंग्टन यांना आहे. त्यांच्याही चरित्रात अशा गोष्टींची सरमिसळ झाली. जॉर्ज वाशिंग्टनच्या संदर्भात आवर्जून सांगितली जाणारी गोष्ट त्याच्या लहानपणी घडलेली आहे. त्याच्या हातात कुऱ्हाड मिळताच त्याने जे कापायचे नव्हते ते ही झाड कापून टाकले. नंतर काहीही आढेवेढे न घेता त्याची कुबली दिली. ही गोष्ट अमेरिकेत सर्वांना माहिती असते. पण ती खरी नाही. त्याच्या संदर्भात ती कुणातरी जवळच्या नातेवाईकाने जोडून दिली असल्याचे नंतर लक्षात आले. तिची सत्यासत्यता पडताळून पाहण्यात आली. काही दशके मात्र ती जॉर्ज वाशिंग्टनच्या चरित्राचा भाग होती. अशीच गोष्ट कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेच्या गोष्टीविषयीही आहे. तिला धरून मराठीत एक सुप्रसिद्ध भावगीतही लिहिले गेलेः "अशीच अमुची आई असती सुंदर रूपवती। आम्हीही सुंदर झालो असतो वदले छत्रपती।' ते ध्वनिमुद्रीत होऊन कित्येकांना पाठही होते. महानायकांच्या चरित्रात असे प्रसंग जोडले जातात. मात्र तो इतिहास असत नाही. ते प्रसंग त्यांच्या चरित्राला पूरक ठरतात आणि त्यातून जनसामान्यांना मार्गदर्शन मिळते व जनसामान्यांतील त्याची प्रतिमा कळते.
पूर्वीच्या काळी चरित्रनायकांच्या चरित्रात त्यावेळच्या सामाजिक परिस्थितीचे बेमालूम मीलन झालेले असे. चरित्र लिहणाऱ्याची स्वत:ची स्वभावप्रकृती त्यात दिसून येई. चरित्रलेखन हेही गुणगानात्मक असे. लेन चिटणीस बखरीतील पाचव्या अध्यायातील आग्रा भेटीचे उदाहरण देतो. बखरीतील मजकुराप्रमाणे महाराज यात्रेला गेले होते. येताना त्यांनी काशी, अयोध्या इ. तीर्थक्षेत्रांना भेटी देऊन पुण्य संपादन केले. पुढे जाऊन बखरीतील एका उताऱ्याचे भाषांतर लेन देतो. त्यात शाईस्तेखानाच्या गोटात शिरण्यापूर्वीचे महाराजांचे भाषण म्हणून दिलेला मजकूर आहे. त्यात महाराज स्वत:ला फकीर म्हणवून घेतात आणि जे एकनिष्ठ आहेत त्यांना आपल्याबरोबर निघण्याचे आवाहन करतात. त्या कथित भाषणाला धरून लेनने तारे तोडले आहेत. त्याच्या मते अठराव्या शतकातील लेखकांनी who transforms Shivaji from the martial hero violently protecting the core of Hinduism (gods, brahmins, and cows) into a character who embodies the core valves of an essentialized universalistic religion (renunciation, contemplation, devotion) (पृ ५१)

No comments: