सीमेवर अडीच तासपर्यंत गोळीबार
जम्मू, दि. २० : या महिन्यात सातव्यांदा युद्धबंदीचे उल्लंघन करीत पाकिस्तानी सैन्याने भारतीय हद्दीत गोळीबार केला.
यावेळी पाकिस्तानी सैन्याने सीमा क्षेत्रातील चक फगवाडी छावणीला लक्ष्य बनविले होते. त्यांनी तोफगोळे आणि छोट्या शस्त्रांनी मारा केला. काल रात्री ९ वाजेनंतर हा हल्ला करण्यात आला. त्यावेळी भारतीय सीमेवर तैनात जवानांनी चोख प्रत्यूत्तर दिले. तरीही तब्बल अडीच तासपर्यंत दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरूच राहिला. रात्री उशीरा तो संपला. पण, सुदैवाने यात प्राणहानी झाली नसल्याचे भारतीय लष्कराच्या सूत्रांनी सांगितले.
यंदा जुलै महिन्यात पाकिस्तानी सैन्याने नियंत्रण रेषा आणि सीमा रेषेवर केलेला हा सातवा हल्ला होता. यापूर्वीही चार वेळा चक फगवाडी क्षेत्रात गोळीबार करण्यात आला होता.
Wednesday 21 July, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment