Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 21 July, 2010

अखेर चंद्राबाबूंची महाराष्ट्रातून हकालपट्टी

सर्व आरोप मागे घेतल्याची जिल्हाधिकाऱ्यांकडून घोषणा
औरंगाबाद , दि. २० : संचारबंदी मोडून समर्थकांसह घुसखोरी करुन महाराष्ट्राला वेठीस धरणा - या चंद्राबाबू नायडू यांची अखेर महाराष्ट्रातून हकालपट्टी करण्यात आली आहे. तसेच संचारबंदी मोडून समर्थकांसह घुसखोरी करुन महाराष्ट्राला वेठीस धरणाऱ्या चंद्राबाबू नायडू यांच्यावरील सर्व आरोप मागे घेत असल्याची घोषणा नांदेड जिल्हाधिका-यांनी आज (मंगळवारी) केली आहे.
आंध्रच्या निवडणुकीत राजकीय फायदा लाटण्यासाठी महाराष्ट्र-आंध्र पाणी प्रश्न चिघळवण्याचा उद्योग नायडू करत होते. सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असताना त्यांच्या राजकीय स्टंटबाजीला ऊत आला होता.
महाराष्ट्र - आंध्र सीमेवरील बाभळी बंधारा प्रकल्पाबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असल्यामुळे प्रकल्पाला भेट देऊन राजकीय आरोप - प्रत्यारोप करू नयेत असे महाराष्ट्र सरकारचे म्हणणे होते . मात्र राजकीय स्वार्थासाठी या आवाहनाकडे दुर्लक्ष करत नायडू यांनी समर्थकांसह बस यात्रा करुन बंधारा पाहण्याचा निर्णय जाहीर केला . अखेर कायदा - सुव्यवस्था राखण्यासाठी राज्य सरकारने संचारबंदी लागू केली . मात्र शुक्रवारी ( १६ जुलै ) संचारबंदी मोडून नायडू यांनी समर्थकांसह महाराष्ट्रात प्रवेश केला आणि बंधा - याच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न केला . अखेर पोलिसांनी नायडू आणि त्यांच्या समर्खकांना ताब्यात घेतले . अटक केल्यापासून नायडू आणि त्यांच्या समर्थकांना व्हिआयपी ट्रीटमेंट मिळत होती . मात्र सतत तक्रारी करणे आणि महाराष्ट्राला बदनाम करण्याचा प्रयत्न करणे हाच उद्योग नायडू आणि त्यांचे समर्थक करत होते . नायडू यांना समर्थकांसह औरंगाबादच्या जेलमध्ये नेण्यात आले, तिथेही व्हिआयपी ट्रीटमेंट मिळत असताना नायडू आणि कंपनी महाराष्ट्राला त्रास देत होती.
या पार्श्वभूमीवर नायडू आणि त्यांच्या समर्थकांवरील सगळे आरोप मागे घेण्यात आले. नांदेड जिल्हाधिका-यांनी तशी घोषणा केली आणि चिखलदरा येथून विशेष विमानाने नायडू आणि त्यांचा समर्थकांना आंध्रला पाठवण्यासाठी आवश्यक ती तयारी करण्यात आली. मात्र आयत्यावेळी नायडू यांनीच विमानात बसण्यास नकार दिला आणि वेळ काढला. मात्र प्रशासनाने समजूत काढून नायडू यांची रवानगी केली.
शिवसेनेचे आंदोलन
नायडू चिखलदरा विमानतळावर आले त्यावेळी शिवसेनेच्यावतीने आंदोलन करण्यात आले. पाच दिवस राजकीय स्टंटबाजी करुन स्वार्थासाठी महाराष्ट्राला वेठीस धरणा-या नायडूंचा शिवसेनेने निषेध केला.

No comments: