नवी दिल्ली, दि. ८ : कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्या विरोधात तिघा भाजप मंत्र्यांनी पुकारलेल्या बंडामुळे कर्नाटक सरकारमध्ये निर्माण झालेला पेचप्रसंग आता सुटला आहे. तडजोडीच्या फॉर्म्युल्यानुसार, आता समन्वय समितीची स्थापना केली जाणार आहे. एका महिला मंत्र्याला वगळण्यात येणार असून, विधानसभा अध्यक्षांचा मंत्रिमंडळात समावेश केला जाणार आहे.
भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांनी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्या उपस्थितीत कर्नाटकातील वाद मिटल्याची घोषणा केली. ८३ व्या वर्षात पदार्पण करणारे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना हे बर्थ डे गिफ्ट असल्याचे मानले जात आहे. मुख्यमंत्री व बंडखोर मंत्री जी. जनार्दन रेड्डी यांच्यामध्ये आता कोणतेही गैरसमज उरलेले नाहीत, असे स्वराज यांनी यावेळी जाहीर केले.
कर्नाटकमध्ये जी समन्वय समिती नेमली जाणारी आहे, त्या समितीचे प्रमुखपद सुषमा स्वराज यांच्याकडे असेल, अशी चर्चा आहे. त्याशिवाय मुख्यमंत्री, ज्येष्ठ नेते अनंतकुमार, प्रदेशाध्यक्ष सदानंद गौडा आणि जी. करूणाकरा रेड्डी यांचाही त्या समितीत समावेश असणार आहे.
Monday 9 November, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment