पणजी, दि. १० (प्रतिनिधी): राज्यात दोन दिवसांपासून विविध भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली असून, आगामी काही दिवसात मुसळधार पावसाची शक्यता पणजी वेधशाळेचे प्रमुख के व्ही सिंग यांनी व्यक्त केली आहे. आज तिसऱ्या दिवशीही सकाळपासून पावसाची रिपरिप विविध भागात सुरूच होती. रात्री मात्र पावसाच्या अनेक सरी बरसल्यात. येत्या काही दिवसात मुसळधार पावसाची शक्यता गोव्यातील काही भागात कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या अवेळीच्या पासामुळे शेतीची नासाडी होण्याची भिती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
कोकण किनारपट्टीवर जवळपास सर्वच ठिकाणी पावसाची रिमझिम सुरू आहे.
चक्रीवादाळाची भीती
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने वादळी वाऱ्यांचा गोव्याला तडाखा बसण्याची शक्यताही हवामान खात्याने वर्तविली आहे. अचानक बदललेल्या या हवामानाचा किनारपट्टीवरील प्रदेशांना अधिक धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे मासेमाऱ्यांना समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. अरबी समुद्रावरील कमी दाबाच्या पट्ट्याने सध्या वादळी वारे ५५ ते ६५ किलोमीटर प्रतितास या वेगाने वाहत आहेत. त्यांचा वेग वाढण्याची शक्यता असून उद्या दुपारपर्यंत वादळ महाराष्ट्र,गोवा आणि कर्नाटकपर्यंत येण्याची शक्यताही व्यक्त केली आहे.
Wednesday 11 November, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment