Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 17 July, 2009

... म्हणे अभयारण्यामुळेच औष्णिक प्रकल्पाला विरोध


राज्य सरकारचे केंद्राला पत्र

पणजी, दि. १६ (प्रतिनिधी)- खोतीगाव अभयारण्यापासून २५ किलोमीटर अंतरावर कारवार जिल्ह्यातील हणकोण येथील नियोजित औष्णिक ऊर्जा प्रकल्पाला गोवा सरकारने तीव्र हरकत घेतली आहे. सदर प्रकल्पाला विरोध करणारे पत्र वीज व पर्यावरण खात्यातर्फे केंद्र सरकारला पाठवण्यात आल्याची माहिती पर्यावरणमंत्री आलेक्स सिकेरा यांनी "गोवादूत'ला दिली. अभयारण्य क्षेत्रात खाण व्यवसायाला परवानगी देणाऱ्या राज्य सरकारने येथून दूरवर उभारण्यात येणाऱ्या औष्णिक प्रकल्पाला विरोध करून एक प्रकारे विनोदी भूमिका घेतली आहे.
कारवार येथील जैविक दृष्ट्या संवेदनशील असलेल्या भागात हा प्रकल्प उभारला जात असल्याने येथील स्थानिकांनीही या प्रकल्पाला विरोध केला आहे. काही महिन्यापूर्वी या भागातील प्रकल्पाला विरोध करणाऱ्या एका शिष्टमंडळाने वनमंत्री फिलीप नेरी रॉड्रिगीस यांची भेट घेऊन राज्य सरकारनेही त्यांच्या या लढ्याला पाठिंबा द्यावा, अशी विनंती केली होती.
हा प्रकल्प अरबी समुद्रापासून केवळ १० किलोमीटर अंतराच्या कक्षेत येतो तसेच कारवार येथील काळी नदीच्या काठावरच तो उभारला जाणार आहे. या भागातील हजारो मच्छीमारी कुटुंबीयांचे स्थलांतर करावे लागणार आहे, अशी माहितीही या शिष्टमंडळाने वनमंत्र्यांना दिली. हा नियोजित प्रकल्प पश्चिम घाट क्षेत्रात येत असल्याने जैविक सृष्टीचा नाश होण्याचीच जास्त शक्यता असल्याचे पर्यावरणवाद्यांचे म्हणणे आहे. कर्नाटकातील अन्शी राष्ट्रीय उद्यान व गोव्यातील खोतीगाव अभयारण्याच्या २५ किलोमीटर अंतरात हा प्रकल्प येत असल्याचेही कारण त्यांनी पुढे केले आहे. माजी खासदार मार्गारेट अल्वा यांनी यापूर्वीच या प्रकल्पाला विरोध केला असून हा प्रकल्प येथील लोकांवर लादण्याचा प्रयत्न झाल्यास सिंगूरप्रमाणे येथे आंदोलन छेडले जाईल, असा इशारा दिला आहे.
आता गोव्याचे पर्यावरणमंत्री आलेक्स सिकेरा यांनीही श्रीमती अल्वा यांच्या या लढ्याला पाठिंबा देत या प्रकल्पाला विरोध करणारे पत्र केंद्रीय पर्यावरण व वनमंत्री जयराम रमेश यांना पाठवल्याची माहिती दिली आहे.

1 comment:

Shankar Jog, Sancordem, Goa said...

It is funny that Goa Govt. which is insensitive to issues of environment like mining pollution, forest, wildlife sanctuaries,National Parks, protection of nature, diversion of river Mhadai by Karnatak, etc. is worried about the Thermal Project coming up at a distance of 25 km. from its border. If a thermal Project at a distance of 25 km. is going to affect Khotigao Sanctuary, and it is true to some extent, how is that this Govt. is allowing mining on borders of Sanctuaries in Goa? This shows how this Govt. is adopting a double-standard.