Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 13 July, 2009

स्कायबसच्या आठवणी ताज्या !

मडगाव, दि. १२ (प्रतिनिधी )- राजधानी नवी दिल्लीत मेट्रो रेल्वेचा बांधकाम चालू असलेला पूल आज कोसळला व त्यामुळे कोकण रेल्वेने पाहिलेल्या पण विविध कारणामुळे अपूर्णावस्थेत असलेल्या स्कायबसला मडगावात झालेल्या अपघाताच्या स्मृती ताज्या झाल्या. तसे पाहिले तर या अपघातामुळेच या प्रकल्पाच्या सुरक्षिततेचा प्रश्र्न उपस्थित झाला व तो अजूनही सुटलेला नाही.
येथील कोकण रेल्वे स्टेशननजीक या प्रकल्पाचा दीड कि. मी. लांबीचा मार्ग (खांबावर उभारलेला पूल) उभारलेला आहे. कोकण रेल्वेचे तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक बी. राजाराम यांनी अनेक अडथळ्यांवर मात करून या प्रकल्पाच्या प्रात्यक्षिकासाठी ५० कोटींची गुंतवणूकही केली होती व त्यांतूनच हा दीड कि. मी. चा चाचणी मार्ग उभारला गेला होता. या चाचणी मार्गावर घेतलेल्या चाचणीचा मुहूर्ताचा नारळच कुजका निघाला. चाचणीसाठी डबा सोडताना कमी वेगात सोडण्याऐवजी वेगाने सोडला गेला,परिणामी तो हेलकावत गेला व या मार्गाच्या खांबावर तो आदळून आत बसलेला दक्षिण मध्य रेल्वेचा एक कनिष्ठ अभियंता मरण पावला होता व तेव्हापासून हा प्रकल्पच शीतपेटीत पडल्यासारखा झाला आहे.
मागे गोवा सरकारने म्हापसा -पणजी दरम्यान तो कार्यरत करण्याचा निर्णय घेऊन त्यासाठी जमिनीचे सर्वेक्षणही केले होते. दिल्लीतील मेट्रो रेल्वेत व स्काय बसप्रकल्पात तसा मोठा फरक नाही हे रेल्वे अधिकारीही मान्य करीत आहेत.

No comments: