Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 16 July, 2009

हा तर नेहमीचाच प्रकार...

संभावित दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह मंत्रालयाने दिलेले सतर्कतेचे आदेश हा तर नेहमीचाच प्रकार असल्याचे मुख्यमंत्री कामत म्हणाले. हे आदेश केवळ गोव्यापुरती मर्यादित नाहीत. या आदेशात महाराष्ट्र व गुजरात राज्यांचाही समावेश आहे. विशेष करून अरबी समुद्राच्या तटावर असलेल्या राज्यांसाठी हे आदेश लागू आहेत. एरवी १५ ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर असे आदेश देण्याची प्रथाच असल्याने त्याची विशेष काळजी करण्याची गरज नाही,असे मुख्यमंत्री म्हणाले. सुरक्षेचे सर्व ते उपाय योजण्यात आले आहेत, असेही ते म्हणाले. दरम्यान,अशा प्रसंगी पोलिस बंदोबस्त वाढवला किंवा तपासणी सुरू केली की प्रसारमाध्यमांकडून विनाकारण गोव्याला दहशतवादी हल्ल्याचा धोका असल्याचा बाऊ केला जातो व त्याचा फटका पर्यटन उद्योगावरही होतो,असेही ते म्हणाले. सुरक्षेसाठी उपाययोजना आखल्या नाहीत व उद्या काही प्रकार घडला तर सरकारवर दोषारोप सुरू होईल, त्यामुळे सरकार याप्रकरणी बारीक लक्ष ठेवून आहे,असेही ते म्हणाले.

No comments: