पणजीवासीयांना मोठाच दिलासा
पणजी, दि. 30 (प्रतिनिधी) - गेले चार दिवस पाण्याअभावी हैराण झालेल्या पणजीवासीयांनी आज सुटकेचा निःश्वास सोडला. कारण कोरड्या पडलेल्या नळांना पाणी आल्याने त्यांच्या चेहरे फुलले होते.
गेल्या चार दिवसापासून अनेकांनी बाजारात मिळणाऱ्या पाण्याच्या बाटल्यांवर गुजराण चालवली होती. त्यात त्यांचा भरपूर खर्च झाला. पाण्याच्या समस्येमुळे गोव्यात सुट्टीसाठी येऊ पाहणाऱ्या नातेवाइकांना फोन करायचा नाही, असे अनेकांना इच्छा नसतानाही ठरवावे लागले. दरम्यान, गेल्या चार दिवसांत लोकांना नळाद्वारे पाणीपुरवठा न झाल्यामुळे त्यासंबंधीचे बिल आकारण्यात येणार नाही, असा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंते श्री. चिमुलकर यांनी दिली.
Saturday 31 May, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment