Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 26 May, 2008

चर्चेचे आमंत्रण फेटाळले

गुज्जर आंदोलनाचा वणवा दिल्लीपर्यंत
नवी दिल्ली, दि. 25 - गुज्जर आंदोलनाचा वणवा थेट दिल्लीपर्यंत पोहोचला असून यामुळे राजस्थानातून दिल्ली तसेच देशात अन्यत्र जाणाऱ्या रेल्वेगाड्यांची सेवा विस्कळीत झाली आहे. गुज्जर आंदोलनाच्या नेत्यांनी सरकारशी बोलणी करण्याची मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांची विनंती फेटाळल्यानंतर हे आंदोलन अधिक तीव्र बनले आहे.
याबाबत माहिती देताना रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की, राज्यातून जाणाऱ्या किमान सात गाड्या आंदोलनामुळे रद्द कराव्या लागल्या आहेत. प्रवाशांच्या सुरक्षेचा विचार करून हा दक्षतेचा उपाय योजण्यात आला. बऱ्याच ठिकाणी आंदोलकांनी रेल्वे रूळ आणि मार्गातील अनेक साधनांची तोडफोड केली आहे. त्यामुळे अपघाताचीही शक्यता लक्षात घेऊन रेल्वेने काही गाड्यांचे मार्ग बदलविले तर काही गाड्या रद्द केल्या आहेत.
शिवाय, संपूर्ण परिसरात गुज्जर आंदोलनामुळे अतिशय तणावाचे वातावरण आहे. जोवर येथे शांतता प्रस्थापित होत नाही तोवर राजस्थानातील काही भागात रेल्वे सेवा बहाल केली जाणार नाही, असेही सूत्रांनी सांगितले. राजधानी गाड्यांचेही मार्ग बदलविण्यात आले आहेत. आज ज्या गाड्या रद्द करण्यात आल्या त्यात डेहराडून-बांद्रा निमाच लिंक एक्सप्रेस, निझामुद्दीन -उदयपूर इंटरसिटी एक्सप्रेस, निझामुद्दीन-इंदूर इंटरसिटी एक्सप्रेस, निझामुद्दीन-मुंबई ऑगस्ट क्रांती एक्सप्रेस आणि फिरोझपूर-मुंबई जनता एक्सप्रेस यांचा समावेश आहे.

No comments: