Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 22 February, 2011

कसाबची शिक्षा कायम

• उच्चन्यायालयाचे शिक्कामोर्तब
• ङ्गहीम, सबाउद्दीन निर्दोष

मुंबई, दि. २१ : संपूर्ण जगाला हादरवून टाकणार्‍या २६ नोव्हेंबरच्या मुंबई हल्लाप्रकरणात आरोपी असणार्‍या अजमल कसाबला विशेष न्यायालयाने दिलेली ङ्गाशीची शिक्षा आज मुंबई उच्च न्यायालयाने कायम ठेवत त्यावर शिक्कामोर्तब केले. या निर्णयाने मुंबई हल्ल्यातील शहिदांच्या कुटुंबीयांसह थेट केंद्र सरकारपर्यंत सार्‍यांनीच समाधान व्यक्त केले. मात्र, या प्रकरणातील सहआरोपी ङ्गहीम अन्सारी आणि सबाउद्दीन अहमद यांच्या सुटकेला आव्हान देणारी महाराष्ट्र शासनाची याचिका मात्र न्यायालयाने ङ्गेटाळून लावली आहे. या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रंजना देसाई आणि न्या. रणजीत मोरे यांच्या न्यायासनाने आज हे दोन्ही महत्त्वपूर्ण निकाल दिले. कसाबवरील सर्व सिद्ध आरोप उच्च न्यायालयानेही मान्य केले आहेत. त्यात असंख्य लोकांची हत्या, त्याचे कारस्थान रचणे आणि देशविरोधी युद्ध अशा आरोपांचा समावेश आहे. ङ्गाशीची शिक्षा कायम ठेवल्याचा निर्णय कसाबने ऐकल्यानंतर नेहमीप्रमाणेच हसत न्यायमूर्तींना ‘शुक्रिया’ म्हणाला. मुंबईवर अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात अनेक पोलिसांना आपले प्राण गमवावे लागले. आपण त्यांच्या बलिदानाचे स्मरण केले नाही तर ही आपल्या कर्तव्यात ङ्गार मोठी कसूर ठरेल, असेही न्यायमूर्तींनी आपल्या निकालात म्हटले आहे. आज कसाबविषयीचा निकाल जाहीर झाला आणि त्याच्या ङ्गाशीवर उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केल्याने सार्‍यांचाच जीव भांड्यात पडला.
मुंबई हल्ल्यादरम्यान पाकमधून एकूण दहा अतिरेकी आले होते. त्यातील ९ अतिरेकी पोलिसांसोबतच्या चकमकीत मारले गेले. केवळ कसाबला जिवंत पकडणे शक्य झाले होते. त्याला २६ नोव्हेंबर रोजी गिरगाव चौपाटी येथून अटक करण्यात आली होती. त्याच्यावर यापूर्वी विशेष न्यायालयात खटला चालविण्यात आला होता. तेथे न्या. ताहिलीयानी यांच्या न्यायासनाने ६ मे २०१० रोजी त्याला ङ्गाशीची शिक्षा सुनावली होती. त्यावर आज उच्च न्यायालयाने आपल्या संमतीची मोहोर उमटवली.

No comments: