Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 1 October, 2010

प्रा. सुभाष वेलिंगकर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे
गोव्यातील प्रमुख नेते
लखनौ उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिलेला निवाडा हा अत्यंत हर्षवर्धक असा आहे. अयोध्येत त्या ठिकाणी मंदिर होते आणि ते पाडून बाबरी ढाचा उभारण्यात आला होता हे या निवाड्यामुळे सिद्ध झाले आहे. इस्लाम धर्मानुसार दुसऱ्यांच्या पवित्र स्थानवर धार्मिक कार्यक्रम मुस्लिम मान्य करीत नाहीत. त्यामुळे जे नव्हेतच त्यासाठी करण्यात येणारा हा अट्टहास होता आणि तो व्यर्थ होता. प्रभूरामचंद्राचे मंदिर हे राष्ट्रीय प्रतीक आहे. हा केवळ मंदिराचा नव्हे राष्ट्रीय अस्मितेचा प्रश्न आहे.

राजेंद्र आर्लेकर
प्रवक्ते, भारतीय जनता पक्ष
लखनौ उच्च न्यायालयाने दिलेला निवाड्याचे भाजप स्वागत करतो, समाजातील सर्व घटकांनी याप्रसंगी दाखवलेला संयम कौतुकास्पद आहे.

No comments: