Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 29 September, 2010

कारवार अपघातात गोव्यातील दोघे ठार

दोघे गंभीर जखमी
काणकोण, दि. २८ (प्रतिनिधी): आज सकाळी कारवार येथील गांवगिरी - चित्तकुला येथे झालेल्या अपघातात जयंत पै वेर्णेकर (५४) व सय्यद हसा बाशा (३३) हे गोव्यातील दोघे जण ठार झाले तर दोघांना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती चित्तकुला पोलिस सूत्रांनी दिली.
सविस्तर माहितीनुसार, आज (दि. २८) सकाळी ७.३० वाजता कारवार राष्ट्रीय महामार्ग क्र. १७ वरील गांवगिरी या ठिकाणी वॉल्वो बस व गोव्याहून कारवारला निघालेली मारुती झेन यांच्यात जबरदस्त टक्कर झाली. या अपघातात पणजी येथील जे. बी. कन्स्ट्रक्शनचे भागीदार जयंत वेर्णेकर व सय्यद बाशा हे जागीच ठार झाले तर शिवप्पा असेच नाव असलेल्या अन्य दोघांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांच्यावर इस्पितळात उपचार सुरू असून त्यांची परिस्थिती सुधारत असल्याचे चित्ताकुलाचे साहाय्यक पोलिस निरीक्षक उमा महेश यांनी सांगितले.
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, पणजी येथील जे. बी. कन्स्ट्रक्शनचे भागीदार असलेले जयंत पै वेर्णेकर आपल्या काही कामगारांना घेऊन कारवार येथे जात होते. बंगलोरहून येणाऱ्या वॉल्वो गाडीने त्यांना महामार्गावर ठोकरले.

No comments: