Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 27 September, 2010

पोलिसांच्या दुर्लक्षामुळे इन्सुली घाट बारा तास ठप्प

सावंतवाडी, दि. २६ (प्रतिनिधी) ः मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर मुंबईहून गोव्याला जाणारा कंटेनर इन्सुली घाटीत कलंडल्यामुळे पहाटे तीन वाजल्यापासून या मार्गावरील वाहतूक खंडित झाली. तब्बल बारा तासांनी म्हणजे आज (दि.२६) संध्याकाळी साडेचारच्या सुमारास हा कंटेनर बाजूस काढल्यानंतर एकेरी वाहतूक सुरू होती. बांदा आणि सावंतवाडी पोलिस स्थानकाच्या सीमेवर हा अपघात झाल्याने दोन्ही पोलिस स्थानकांनी याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे याचा फटका वाहनचालकांना बसला. शेवटचे वृत्त हाती येईपर्यंतही याठिकाणी एकेरीच वाहतूक चालू होती.

No comments: