पणजी, दि. २६ (प्रतिनिधी)
चार दिवसाच्या विश्रांतीनंतर राज्यात पावसाने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ४६.८ मि.मी. पावसाची नोंद झाली असून पुढील ४८ तासांत पावसाचा हा जोर असाच कायम राहणार असल्याची शक्यता पणजी वेधशाळेने व्यक्त केली आहे. आत्तापर्यंत पावसाची नोंद १५३०.८ मि.मी. अशी झाली असून आजचे तापमान कमाल २८.८ व किमान २२.१ सेल्सिअस नोंद झाले होते.
दरम्यान आज दिवसभर पडलेल्या जोरदार पावसामुळे राज्यात अनेक ठिकाणी झाडे व घरांची पडझड झाली. तसेच नदीनाल्यांना पूर आल्याने लोकांची तारांबळ उडाली. अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी भरल्याने वाहतूक खोळंबण्याचे प्रकारही घडल्याचे वृत्त आहे.
Wednesday 27 July, 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment