Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 7 November, 2010

भंडारी समाजाचा भव्य मेळावा

ज्ञातीबांधवांना एकत्र येण्याचे आवाहन

पेडणे, दि. ६ (प्रतिनिधी) - प्रत्येक समाजाचा विकास झाला तरच राज्याचा आणि पर्यायाने देशाचा विकास होऊ शकतो याची जाणीव भंडारी समाज ज्ञाती बांधवांनी ठेवावी. आपसातील मतभेद विसरून सर्वांनी एकत्रित यावे व समाजाचा विकास करावा, असे आवाहन भंडारी समाजाच्या मेळाव्यात करण्यात आले. मांद्रे मधलामाज येथे पेडणे तालुका गोमंतक भंडारी समाजाचा भव्य तालुका मेळावा आज पार पडला.
या मेळाव्याला प्रमुख पाहुणे या नात्याने राज्याचे गृहमंत्री रवी नाईक उपस्थित होते. आपण सरकार दरबारी समाजाला २७ टक्के आरक्षण मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन त्यांनी याप्रसंगी दिले. व्यासपीठावर खासदार श्रीपाद नाईक, वेंगुर्ल्याचे माजी आमदार शंकर कांबळी, शिवोलीचे आमदार दयानंद मांद्रेकर, पेडणे तालुका गोमंतक भंडारी समाजाचे अध्यक्ष तथा पेडण्याचे आमदार दयानंद सोपटे, शिरोड्याचे आमदार महादेव नाईक, मुरगावचे आमदार मिलिंद नाईक, सरचिटणीस शिवकुमार आरोलकर व नीळकंठ पेडणेकर आदी मान्यवर उपस्थित होते. स्वागत सुशांत मांद्रेकर यांनी केले श्रीधर मांजरेकर, महेश कोनाडकर, वैकुठ नाईक, जयवंत गोवेकर, काकुलो किनळेकर व नीळकंठ पेडणेकर आदींनी पाहुण्यांना पुष्पगुच्छ प्रदान केले.
सूत्रसंचालन शिवकुमार आरोलकर यांनी केले. मेळाव्याला समाजाचे बांधव मोठ्या संख्येने हजर होते. यावेळी १० वी व १२ वीतील यशवंत विद्यार्थी सर्वश्री दत्तप्रसाद नाईक, मधू कांबळी, प्रसाद आरोलकर, बापू बांदेकर, राजबा नर्से, साईदास आपटे, साईनंद सोपटे, प्रियांका तांडेल, शुभांगी आरोस्कर, गंधाली मावळणकर, तृप्ती नार्वेकर, नरहरी चंद्रोजी, अनिकेत नावेलकर, दिनेश फडते, श्वेता घोरे, अंकिता कळंगुटकर, सभिक्षा वस्त, शांती कानोळकर, अक्षय नारोजी, संकेत हरमलकर, सिद्धी रामचंद्र सांगळे, आश्विनी कशाळकर, प्रियांका राऊळ, किशोर राऊळ, आलिक्षा किनळेकर, आरती राऊळ, सिंदीया सोपटे, स्नेहा धारगळकर, रुपेश आंंबेकर या विद्यार्थ्यांना गौरवण्यात आले. तसेच विविध कला क्षेत्रातील मान्यवर सखाराम नारोजी, नारायण केरकर, तारा हडफडकर, दिवाकर नाईक, मनोहर म्हान्जी, डॉ. अनंत नाईक, ज्योती जयराम पाळणी, भालचंद्र कळंगुटकर, सुर्या वस्त, श्रीपाद म्हामल, धोंडू वायंगणकर, सुरेश बांदेकर, नामदेव आसोलकर यांचा आणि विविध सरपंच व उपसरपंच रक्षा रंगनाथ कलशावकर (मांद्रे) प्रदीप नाईक (हरमल), अर्चना पालयेकर (पालये) रिमा रामा हरजी (केरी), तुळशीदास म्हालकर (पार्से), अनुपा कांबळी (विर्नोडा), प्रदीप ऊर्फ भूषण नाईक (धारगळ) संजीवनी बर्डे, सूचना गडेकर, तुळशीदास गवंडी, शोभा हरमलकर आणि जिल्हापंचायत सदस्य श्रीमती श्रीधर मांजरेकर, दीपक कळंगुटकर, सुरंगी हरमलकर यांचा व आमदार दयानंद सोपटे यांचा शाल व श्रीफळ व भेटवस्तू देऊन जाहीर सत्कार करण्यात आला.
दोन ठराव मंजूर
अन्य समाजातील जाती जमाती व इतरांना जसे आरक्षण मिळते त्याचप्रमाणे भंडारी समाजाला २७ टक्के आरक्षण मिळावे असा ठराव याप्रसंगी मंजूर करण्यात आला. पंचायती, पालिका व जिल्हा पंचायत निवडणुकीत भंडारींसाठी आरक्षण आहे; त्याचप्रमाणे गोवा विधानसभेच्या निवडणुकीतही आरक्षण देण्याची जोरदार मागणी करण्यात आली. ठरावाला शिरोड्याचे आमदार महादेव नाईक यांनी अनुमोदन दिले.
खासदार श्रीपाद नाईक यांनी आपल्या भाषणात समाजातील बांंधवांनी आर्थिकदृष्ट्या व शैक्षणिकदृष्ट्या विकास करावा, असे आवाहन केले. ज्ञातीच्या विकासासाठी अशा मेळाव्याची गरज आहे. समाज हे मंदिर आहे. त्या मंदिरात पक्षीय राजकारण बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र यावे, असे श्री. नाईक यांनी आवाहन केले.
शंकर कांबळी यांनी, १० वर्षांपूर्वी वेंगुर्ले येथे भंडारी समाजाचा मेळावा झाल्यानंतर आपण भंडारी समाजाचा आमदार म्हणून निवडून आल्याचे स्पष्ट केले.
आमदार दयानंद सोपटे यांनी समाजाचा लवकरच सभागृह बांधण्याची घोषणा केली.
यावेळी आमदार दयानंद मांद्रेकर, मिलिंद नाईक, महादेव नाईक यांची समयोचित भाषणे झाली. मेळाव्याप्रसंगी सभागृह खचाखच भरले होते. मान्यवरांना आमदार दयानंद सोपटे यांच्या हस्ते भेटवस्तू देण्यात आल्या. संतोष कोटखणकर यांनी आभार मानले.

No comments: