जयपूर, दि. २१ आपल्या चार मुलींना विष देऊन नंतर माता-पित्यांनी आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना राजस्थानच्या हनुमंतगड जिल्ह्यात शनिवारी रात्री रोडावली गावात घडली. ओमप्रकाश (३५) आणि त्याची पत्नी शुकली देवी (३०) यांनी आधी पूजा (८), अंजली (५), अर्चना (३) आणि एक वर्षीय मुन्नी या चार मुलींनी विष देऊन त्यांची हत्या केली आणि नंतर स्वत:ही मृत्यूला जवळ केले. या दाम्पत्याने एवढी टोकाची भूमिका का घेतली, याचा तपास सुरू आहे, असेही पोलिसांनी सांगितले.
पोलिसी बेफिकीरीचे
बिहारमध्ये ८ बळी
औरंगाबाद (बिहार), दि. २१ ः बिहारमधील नक्षलग्रस्त औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी झालेल्या भूसुरुंग स्फोटात ५ लहान मुलांसह ११ जण ठार झाले. विधानसभा निवडणुकीचा शेवटचा टप्पा आटोपल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ही घटना घडली. नक्षलवाद्यांनी पेरून ठेवलेला हा भूसुरुंग कालच पोलिस पथकाला आढळला होता. हा बॉम्ब निष्क्रिय करणाऱ्या पथकाने तो एका शेतात ठेवून दिला होता.
Sunday 21 November, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment