Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 25 April, 2009

एप्रिलक्रांतिनिमित्ताने पोर्तुगीजप्रेम उफाळले!

आयोजक व विरोधक आमनेसामने वाद चिघळणार?
पणजी, दि. २४ (प्रतिनिधी) : 'इन्स्टिट्यूट कामोईश'संस्थेतर्फे "एप्रिलक्रांती' या महोत्सवाचे आयोजन करताना आपल्याला अंधारात ठेवल्याची भूमिका घेऊन गोवा विद्यापीठाने हात झटकले आहेत तर , आम्ही पोलिस संरक्षणात हा महोत्सव साजरा करणारच, असे आज आयोजकांनी निदर्शने करणाऱ्या हिंदू जनजागृती समितीला सांगितले. त्यामुळे हा वाद अधिक चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आज सकाळी स्वातंत्र्यसैनिक नागेश करमली, दिव्य जागृती समितीचे निवृत्त कॅप्टन दत्ताराम सावंत, हिंदू जनजागृती समितीचे जयेश थळी, सदाशिव धोंड व सौ. राजश्री गडेकर यांनी विद्यापीठाचे उपकुलगुरू डॉ. देवबागकर यांनी भेट घेऊन चर्चा केली. यावेळी त्यांनी या कार्यक्रमाविषयाची आम्हाला अधिक काहीच माहीत नसल्याचे सांगितले. राजबंदी न्याय आंदोलन समितीने गोवा विद्यापीठाच्या या कारभाराचा निषेध नोंदवला आहे.
दरम्यान, सायंकाळी हॉटेल "गोयचिन'च्या समोर असलेल्या इमारतीत सायंकाळी ६ वाजता कार्यक्रम सुरू झाला. यावेळी हिंदू जनजागृती व शिवसेनेने याठिकाणी पोर्तुगीजधार्जिण्या गोवा विद्यापाठीच्या विरोधात जोरदार घोषणा देऊन निषेध नोंदविला. यावेळी मोठ्या प्रमाणात पोलिस पहारा ठेवण्यात आला होता. कार्यक्रम सुरू असलेल्या ठिकाणी जाण्यास पोलिसांतर्फे मज्जाव करण्यात आल्याने समितीच्या दोन सदस्यांनी कार्यक्रमाच्या आयोजकांची भेट घेतली.
समितीचे निमंत्रक जयेश थळी व शिवसेनेचे श्रीकृष्ण वेळुस्कर यांनी या कार्यक्रमाचे आयोजक तथा गोवा विद्यापीठाच्या पोर्तुगीज भाषा विभागाचे प्रमुख प्रा. डॉल्फिन कोरिया डास्लिवा यांची भेट घेऊन निषेध नोंदविला तसेच हा कार्यक्रम बंद करण्याची मागणी केली. आम्ही कोणत्याही परिस्थितीत हा कार्यक्रम बंद पाडणार नसल्याचे सांगून प्रा. डास्लिवा यांनी थेट आव्हानच दिले. दि. २४ ते २६ पर्यंत तीन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमाला पोलिस संरक्षण दिले जाणार आहे.
राजबंदी न्याय आंदोलन समिती
'स्टॉकहोम सिंड्रोम' या मानसिक रोगाने ग्रस्त असलेले काही गोमंतकीय पोर्तुगीज राजवटीचा उदो उदो करताना दिसतात. पोर्तुगीज राजवट खऱ्या अर्थाने सक्तीचे धर्मांतर, गरिबीचे समर्थन व भयानक दडपशाही या साठीच प्रसिद्ध असून सुद्धा हे घडत असल्याने ही दुःखाची बाब असल्याचे मत राजबंदी न्याय आंदोलन समितीचे निमंत्रक प्रा. दत्ता भि.नाईक यांनी व्यक्त केले आहे. गुणवाढ प्रकरण, रॅगिंग आणि विद्यार्थिनींशी असभ्य व्यवहार यासाठी प्रसिद्ध असलेल्या गोवा विद्यापीठाने हा उद्योग करून आपली लोकप्रियता अधिकच घसरवलेली असल्याचेही प्रा. नाईक यांनी म्हटले आहे. तसेच देशभक्त शक्तींना गुलामगिरीचे उदात्तीकरण करणाऱ्या या उपक्रमास विरोध करण्याचे आव्हानही त्यांनी केले आहे.

1 comment:

Anonymous said...

Portuguese have gone, but their salzarian mindset and hatred for India is left in the form of these converted assholes. After all, the converted KIRISTAVS are more hindu haters than the original kiristavs. Jai Ho.