Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 13 March, 2008

विकासकामांबाबत जनता समाधानीः मुख्यमंत्री

तीन पुलांची पायाभरणी
मडगाव, दि. १३ (प्रतिनिधी): आपल्या सरकारने गेल्या नऊ महिन्यांत या राज्याचा जो विकास केला आहे, त्याबद्दल जनतेमध्ये समाधानाची भावना असून तातडीने निवडणूक झाल्यास २५ ते ३० जागा जिंकून कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडी पुन्हा सत्तेवर येईल, असा दावा मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी आज येथे केला. केळशी ते असोळणा, वार्का ते सिकेरी व वार्का ते तळावली या तीन पुलांच्या पायाभरणी समारंभात ते बोलत होते.
कॉंग्रेस व राष्ट्रवादीची युती भक्कम असून, अन्य कोणाचाही पाठिंबा सरकारला गरज नसल्याचे ठाम निवेदन यावेळी कॉंग्रेस नेत्यांनी केले.
आपण निवडणुकीवेळी दिलेले आश्वासन पाळल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चर्चिल आलेमाव यांनी यावेळी सांगितले.
राज्याची आर्थिक स्थिती मजबूत असून, प्रथमच १२०० कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आल्याचे अर्थमंत्री दयानंद नार्वेकर यांनी सांगितले. पालिका मंत्री जोकीम आलेमाव, गृहमंत्री रवी नाईक, जुझे फिलीप डिसोझा, फिलीप नेरी आदी मंत्री यावेळी उपस्थित होते.

No comments: