Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 25 October, 2010

वार्ताकारांना न भेटण्याचा निर्णय

श्रीनगर, दि. २४ - काश्मीर समस्या प्रलंबित ठेवण्याचाच प्रयत्न केंद्र सरकारने चालवला असल्याचा आरोप करत, जम्मू-काश्मिरात पाठविलेल्या वार्ताकारांशी चर्चा न करण्याचा निर्णय हुर्रियत कॉन्फरन्सच्या मवाळ गटाने आज घेतला आहे.
वार्ताकारांच्या पथकाला वैयक्तिक स्तरावर आमचा काहीही विरोध नाही. मात्र, काश्मीर समस्या प्रलंबित ठेवण्याचाच हा सरकारचा प्रयत्न असल्याची आमची भावना आहे. त्यामुळे या पथकाशी चर्चा न करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे, असे हुर्रियतच्या मवाळ गटाचे नेते मिरवाईझ उमर फारूक यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले. काश्मिरी जनतेचा संदेश स्पष्ट असून, आमच्या मनात याप्रकरणी कुठलाही संभ्रम नाही. आम्हाला स्वयंनिर्णयाचा अधिकार हवा आहे आणि गेल्या पाच महिन्यांपासून आम्ही त्यासाठीच लढत आहोत, असेही मिरवाईझ यांनी सांगितले. हुर्रियतने याआधी भारत आणि पाकिस्तानच्या पंतप्रधानांशी चर्चा केलेली असल्याने नव्याने वार्ताकारांची नियुक्ती करण्याची काय गरज होती, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

No comments: