Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 15 May, 2010

विद्युत तारेचा बसला स्पर्श ३० वऱ्हाडी मृत्युमुखी

मंडला, दि. १४ : मध्यप्रदेशच्या मंडला जिल्ह्यात आज झालेल्या एका भीषण दुर्घटनेत उच्च दाबाच्या विद्युत तारेचा बसला स्पर्श झाल्याने ३० जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
या दुर्घटनेतील सर्व जण एक विवाहाचे वऱ्हाडी होते. अपघात झाला त्यावेळी बसच्या टपावर नियमापेक्षा जास्त उंचीवर सामान ठेवले असण्याची शक्यता आहे. त्यामुळे खराब रस्ता वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाचा बसवरील ताबा सुटला असावा आणि त्यामुळे बसला तारेचा स्पर्श होऊन बसमध्ये करंट आल्याने ही घटना घडली, असे मंडल्याचे जिल्हाधिकारी के. के. खरे यांनी सांगितले. मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे, असेही ते म्हणाले.
अपघातच्यावेळी बसमध्ये नेमके किती प्रवासी होते याचा तपास पोलिस सध्या करत आहेत. त्यामुळे जखमींचा नेमका आकडा अद्याप समजू शकला नाही. ही बस दोनी येथून सुकारियाकडे जात असताना सुर्जापूर गावाजवळ हा अपघात झाला.
बिहारच्या वैशाली जिल्ह्यातही काल अशाच प्रकारचा अपघात झाला होता. या अपघातात ३ जण ठार झाले होते आणि करंट लागल्यामुळे २२ जणांना जळाल्याच्या जखमा झाल्या होत्या, हे येथे उल्लेखनीय.

No comments: