भुवनेश्वर, दि. ९ - ओरिसातील नारायणपाटणा या ठिकाणी जवानांबरोबर झालेल्या चकमकीत १० नक्षलवादी ठार झाले आहेत. ओरिसाच्या कोरापूर जिल्ह्यात नक्षलवादी व सुरक्षा जवान यांच्यात आज सकाळपासून पुन्हा चांगलीच चकमक उडाली आहे. कालही चकमक उडाली होती परंतु आज सकाळी तिला पुन्हा सुरुवात झाली.
दरम्यान, ठार करण्यात आलेल्या नक्षलवाद्यांजवळ सापडलेल्या साहित्याची चौकशी सुरू आहे. नक्षलवाद्यांंकडे १२ बॅग सापडल्या असून ठार झालेल्या १० नक्षलवाद्यांबरोबर आणखीही काही नक्षलवादी असल्याची माहिती मिळाली आहे. त्यानुसार लष्कराची शोध मोहीम सुरू आहे.
वर्षभरात ३२ पोलिसांचे बळी
ओरिसात माओवाद्यांनी २००९ मध्ये विविध ठिकाणी केलेल्या हल्ल्यांत ३२ पोलिसांचा बळी गेला आहे. गेल्या वर्षी माओवाद्यांनी राज्यात विविध ठिकाणी २६६ हल्ले केले. माओवाद्यांच्या कारवाया रोखण्यासाठी सरकारने पावले उचलली आहेत तसेच सरकार पोलिसांच्या अत्याधुनिकीकरणास प्राधान्य देत आहे.
Monday 10 May, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment