जी व्यक्ती स्वतःचीच बाजू न्यायालयात यशस्वीपणे मांडू शकत नाही, ती व्यक्ती राज्याची बाजू न्यायालयासमोर मांडण्यास सक्षम आहे का, असा प्रश्न उच्च न्यायालयाच्या आजच्या निवाड्यामुळे उपस्थित झाल्याची प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी "गोवादूत'शी बोलताना व्यक्त केली. आयरिश प्रकरणी ऍडव्होकेट जनरल सुबोध कंटक यांचा मुद्दा उच्च न्यायालयाने फेटाळला आहे, त्यासंबंधी बोलताना पर्रीकर पुढे म्हणाले, कंटक यांनी आत्तापर्यंत युक्तीवाद कमी आणि प्रतिज्ञापत्रेच जास्त सादर केली आहेत. प्रत्येक बाबतीत तडजोडीची त्यांची ही धडपड समर्थनीय नाही.
सध्या वादग्रस्त ठरलेल्या "हायसिक्युरिटी नंबर प्लेट'संबंधी सरकार फेरविचार करीत असल्याचे कंटक यांनी प्रतिज्ञापत्राद्वारे न्यायालयाला सांगितले होते, तथापि दुसऱ्या बाजूस मात्र नंबर प्लेट निर्णयाची कार्यवाहीही सुरू झाल्याचे दिसून आले, असे पर्रीकर यांनी पुढे सांगितले.
Saturday 29 August, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment