पणजी,दि.१६ : शिक्षकांचे निवृत्तीवय सध्याच्या ६० वरून पुन्हा ५८ वर आणण्याचा सध्या तरी कोणताही प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन नसल्याचा खुलासा सरकारने केला आहे.
एकूण ३३ वर्षांचा सेवाकाळ पूर्ण होताच शिक्षकांना निवृत्त करण्याचा कोणताही विचार नसल्याचे राज्य शासनाने म्हटले आहे.गेले कित्येक दिवस यासंबंधात उलटसुलट बातम्या व पत्रे वृत्तपत्रात प्रसिद्ध होत होती.त्या संबंधात हे स्पष्टीकरण करण्यात आले असून शिक्षकांनी विचलित न होता अध्यापनकार्य चालू ठेवावे असा दिलासा दिला आहे.
Wednesday 17 December, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment