Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 27 July, 2008

आपले सरकार वाचवण्यासाठी
"संपुआ'ने मोजले ६०० कोटी
भाजपचा सनसनाटी आरोप

नवी दिल्ली, दि. २६ - डाव्यांनी पाठिंबा काढल्यानंतर अल्पमतात आलेल्या संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारला आणखी सहा महिन्यांचे जीवनदान देण्यासाठी सत्तेच्या दलालांनी ६०० कोटी रुपये मोजले, असा आरोप भारतीय जनता पक्षाने आज येथे केला.
आपले हे ६०० कोटी रुपये वसूल करण्यासाठी हे सत्तेचे दलाल आता सरकारवर दबाव आणून आपल्या वैध आणि अवैध अशा दोन्ही मागण्या पूर्ण करीत आहेत आणि त्यांच्या उपकारापुढे दबलेले सरकारही त्यांच्या या मागण्या पूर्ण करीत आहेत, असे भाजपचे उपाध्यक्ष मुख्तार अब्बास नकवी यांनी पत्रकारांना सांगितले.
२२ जुलै रोजीच्या विश्वास मताने देशातील काळाबाजारी आणि संपुआ सरकार यांच्यातील संबंधाचा पर्दाफाश केला आहे. संपुआ सरकारच्या गैरकृत्याची मोठी किंमत देशाला मोजावी लागणार आहे, असे ते म्हणाले.
भाजपच्या खासदारांना खरेदी करण्यासाठी कॉंगे्रस आणि सपा नेत्यांनी दिलेल्या लाच प्रकरणाची लोकसभा सभापती सोमनाथ चॅटर्जी यांनी तातडीने चौकशी करावी आणि दोषींविरुद्ध कडक कारवाई करावी, अशी मागणी करताना ते म्हणाले, अल्पमतात आलेल्या संपुआ सरकारला खासदारांच्या खरेदी-विक्रीशिवाय बहुमत सिद्ध करणे शक्यच नव्हते.

No comments: