Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 10 February, 2011

आरुषी हत्याकांडाला नवी कलाटणी

नवी दिल्ली, दि. ९ : दिल्लीतील बहुचर्चित आरुषी हत्याकांडाचा बंद करण्यात आलेला तपास पुन्हा सुरू करण्याचे आदेश सीबीआय कोर्टाने बुधवारी दिला. आरुषीच्या आईवडिलांवरच तिची हत्या केल्याचा संशय असला तरी, पुराव्याअभावी हा तपास थांबवण्यात आला होता. आरुषी आणि हेमराज यांच्या दुहेरी हत्येचा हा तपास ज्या मुद्यांवर बंद करण्यात आला, तेथून पुन्हा तपास करण्यात यावा. तसेच यासाठी आरुषीचे वडील राजेश आणि आई नुपूर तलावर या दोघांवर आरोपपत्र दाखल करण्यात यावे, असा आदेशही कोर्टाने दिला आहे.
त्यामुळे भारतीय दंडविधानाच्या (आयपीसीच्या) कलम ३०२ आणि १२० च्या प्रमाणे हा खटला चालवण्यात येणार आहे. त्यासाठी खटला बंद करण्यासाठी देण्यात आलेला अहवालच चार्जशीट म्हणून स्वीकारला जाईल. तसेच यापुढील सुनावणी २८ ङ्गेब्रुवारीस होणार असून तलवार दाम्पत्यास कोर्टापुढे हजर राहण्यास सांगितले आहे.

No comments: