Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 15 April, 2010

बिहार, प. बंगालला वादळाचा तडाखा

६६ ठार, शेकडो जखमी असंख्य बेघर
रायगंज (प. बंगाल), दि. १४ : पश्चिम बंगालमध्ये उत्तर दिनाजपूर जिल्ह्यात आलेल्या भीषण वादळाने सुमारे ३१ जणांचा बळी घेतला आहे. हा परिसर बांगलादेशाच्या सीमेला लागूनच आहे. या वादळाने बिहारमधीलही बराचसा भाग आपल्या विळख्यात घेतला असून एकूण बळींची संख्या ६६ वर पोहोचली आहे. वादळामुळे असंख्य लोक बेघर झाले असून दोन्ही राज्यांच्या प्रशासनाने ताबडतोब मदत आणि बचाव कार्य हाती घेतले आहे.
या वादळाने बिहारच्याही चार जिल्ह्यांना तडाखा दिला आहे. बिहारमधील किशनगंज, अरारिया, पूर्णिया आणि सुपौल या जिल्ह्यांमध्ये वादळाने थैमान घातले. येथे सुमारे ३३ जण ठार तर १२५ जखमी झाल्याचे वृत्त आहे.
वादळामुळे या परिसरात झालेल्या नुकसानीचा अंदाज येऊ शकलेला नाही.

No comments: