म्हापसा, दि. २८ (प्रतिनिधी): जिवंत मारण्याची सुपारी घेतलेल्या संशयितांना जाब विचारण्यासाठी गेलेल्या बेलीवीस्तावाडा येथील दोन गटांत मारामारी होण्याची घटना काल रात्री घडली असून यात तीन व्यक्ती जखमी झाल्या असल्याची माहिती कळंगुट पोलिसांनी दिली.
याविषयी मिळालेल्या माहितीनुसार २७ रोजी रात्री बलोविस्तावाडा येथे राहणारा पवन होबळे याने आपल्याला जिवंत मारण्याची सुपारी घेतली असल्याचा संशय बेलोविस्तावाडा येथे राहणारा उमेश नाईक याला आल्याने तो आपला भाऊ रवींद्र नाईक व कोलंडराज नायडू हे तिघे पवन याच्या घरी गेले. यावेळी दोन्ही गटांत झालेल्या बाचाबाचीनंतर भांडण जुंपले व हातघाईवर प्रकार आला. यात पवन होबळ, प्रीती होबळे, प्रितेश होबळे व प्रकाश राठोड हे जखमी झाले. या विषयीची तक्रार कळंगुट पोलिस स्थानकात नोंद झाल्यानंतर उपनिरीक्षक गौरीश परब याने जखमीला कांदोळी येथील आरोग्य केंद्रात उपचारासाठी पाठवून घरी पाठवले आणि संशयित उमेश, रवींद्र आणि कोलंडराज यांना अटक केली. यानंतर रात्री उशिरा पवन होबळेच्या गटाने सुमारे १५ ते २० गुंड आणून दुसऱ्या गटातील सुमारे ५ ते ७ जणांना घरात जाऊन दांडा आणि लोखंडी सळयांनी अन्नमा गौडा, सुशील नायडू, मोहनी नायडू, लक्ष्मी नाईक व रेखा नाईक यांना मारहाण करून जखमी केले,अशी तक्रार पोलिस स्थानकांवर नोंद झाली आहे.
स्थानिक सरपंच नीळकंठ नाईक म्हापसेकर यांनी जखमी अन्नामा गौडा, मिराली नाईक व आरक्या नायडू या महिलांना १०८ मधून उपचारासाठी बांबोळी येथे पाठविले तर इतर जखमींना कळंगुट पोलिस स्थानकात तक्रार सादर केली. या वादामुळे या परिसरात तणाव निर्माण झाला असून राजकीय वादातून हे भांडण जुंपले असल्याचा संशय व्यक्त केली जात आहे.
Monday 1 February, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment