जकार्ता, दि.२७ : इंडोनेशियाची राजधानी असलेल्या जकार्ता जवळील एक धरण फुटल्यामुळे सुमारे ५० जण मरण पावले असून शंभरावर घरे बुडाली असल्याची भीती आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. आज पहाटे लोक आपापल्या घरी निद्राधीन असताना त्यांच्या घरी पाणी घुसले. त्सुनामी तर आली नाही ना, या भीतीने अनेकांनी आपल्या घरांमधून पळ काढला होता. बचाव पथकाने तातडीने कारवाई करून अनेकांचे जीव वाचविले असले तरी अनेकांना आपले प्राण गमवावे लागले, तर अनेक जण अजूनही बेपत्ता असल्याची माहिती आहे.
ही घटना अचानक घडली. सर्व जण पहाटेच्या साखर झोपेत असताना ही घटना घडल्यामुळे मोठ्याप्रमाणावर प्राणहानी झाली, असेही आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
बेपत्ता झालेल्या लोकांची संख्या शंभरच्या जवळपास आहे. मृतकांचा आकडाही वाढू शकतो, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे.
भारतीय वेळेनुसार ही घटना मध्यरात्री साडे बारा वाजता घडली. त्या अगोदर वादळी वारे वाहू लागली होती आणि मुसळधार पाऊसही झाला होता. अनेक ठिकाणी झाडे मुळासकट उन्मळून पडलेली दिसून आली, असेही त्यांनी सांगितले. अजूनही अनेक जण या जलमय झालेल्या भागात फसले असून त्यांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी बचाव कार्य सुरू आहे. या लोकांना बाहेर काढण्यासाठी दहा रबरी बोटींचा वापर केला जात आहे, असेही ते म्हणाले.
Saturday 28 March, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment