दौसा, दि.१२ : राजस्थानात गुज्जर आंदोलनादरम्यान अटक करण्यात आलेल्या २४ महिलांना आज जामिनावर मुक्त करण्यात आले असून, आता या मुक्ततेमुळे सरकार आणि गुज्जर यांच्यातील चर्चेचा मार्ग मोकळा झाल्याचे मानले जात आहे.
महिला आंदोलनकर्त्यांच्या जामीन अर्जावर आज दौसा येथील जिल्हा न्यायालयात सुनावणी झाली. या महिलांना ६ जून रोजी दौसा जिल्ह्यातील बांदीकुई येथून रेल रोको आंदोलन करताना अटक करण्यात आली होती. त्यांच्याविरुद्ध रेल्वे ऍक्टशिवाय शांतता भंग करणे आणि हिंसाचार पसरविण्याचे आरोप दाखल झाले आहेत.
या महिलांना जामीन देणार नाही, असे काल सरकारने म्हटले होते. तेव्हा गुज्जर आंदोलनाचे प्रमुख कर्नल किरोडी सिंह बैंसला यांनी सरकारसोबतच्या चर्चेसाठी या महिलांच्या मुक्ततेची अट ठेवली होती. वास्तविक प्राथमिक स्तरावरील चर्चेची फेरी सुरू झाली होती. पण, निर्णायक क्षणी बैंसला यांनी चर्चा थांबवून दिली. जोवर महिलांना सोडले जाणार नाही तोवर चर्चा पुढे सरकणार नसल्याचा हेका बैंसला यांनी लावून धरला होता. आता या महिला आंदोलनकर्त्यांना सोडण्यात आल्याने सरकार आणि गुज्जर नेत्यांच्या चर्चेतील अडथळे संपुष्टात येण्याची आशा निर्माण झाली आहे.
Thursday 12 June, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment