९० हजार चौरस किलोमीटर
भारतीय जागेवर चीनचा दावा
नवी दिल्ली, दि. २७ - अरुणाचल प्रदेशातील तवंग या भागासह ९० हजार चौरस किलोमीटर जागा भारताने व्यापल्याचा दावा चीनने केला असल्याची माहिती आज परराष्ट्र मंत्री प्रणव मुखर्जी यांनी लोकसभेत दिली.
अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग असून, सरकारने ही भावना चीनला कळविली असल्याची माहिती मुखर्जी यांनी एक लेखी उत्तरात दिली आहे. आणखी एका उपप्रश्नाला उत्तर देताना आंतरराष्ट्रीय सीमेबाबत चीनने वाद निर्माण केल्याचे मुखर्जी यांनी म्हटले आहे.
१९९३ पासून दोन्ही देशांनी नियंत्रणे रेषा हीच तात्पुरती सीमा मानून शांतता राखण्याचे ठरविण्यात आले होते, आता या नियंत्रण रेषेसंबंधी अधिक स्पष्टीकरण करण्याच्या दृष्टीने संयुक्त कार्यकारी गट व अन्य समित्यांच्या बैठकी घेतल्या जात असल्याची माहिती मुखर्जी यांनी दिली.
Thursday 28 February, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment