काठमंाडू, दि. ३० - राजकीय अस्थिरतेमुळे गेले तेरा महिने अतिशय अस्वस्थ स्थितीत घालविल्यानंतर दडपणाखाली असलेल्या माधवकुमार नेपाळ यांनी आज पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. विरोधी पक्षाबरोबरच स्वपक्षीयांनीही नेपाळ यांच्यावर राजीनाम्याची मागणी केल्याने येत्या आठवड्यात होणाऱ्या संसद अधिवेशानातील नाचक्की टाळण्यासाठी त्यांनी राजीनामा दिल्याचे समजते.
आपण स्वखुशीने राजीमाना देत असून, शांतता प्रक्रिया आणि घटनेला मूर्त स्वरुप देण्याचे प्रयत्न यशस्वी करण्याचा मार्ग मोकळा करीत आहे, असे नेपाळ या ज्येष्ठ डाव्या नेत्यांने आपल्या दूरचित्रवाणीवरील भाषणात सांगितले. २००८ साली प्रजासत्ताक घोषित झाल्यानंतर नेपाळमध्ये सत्तेवर आलेले हे दुसरे सरकार आहे. यापूर्वी माओवाद्यांचे सरकार केवळ नऊ महिने टिकले होते. त्यावेळी पुष्पकमल प्रचंड यांनी राजीनामा देताना नेपाळच्या डाव्या पक्षांवर अस्थिरतेचे खापर फोडले होते. नेपाळ यांनीही हेच कारण आता दिले आहे.
Thursday 1 July, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment