Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 27 December, 2008

आयटी क्षेत्रात ५० हजार नोकऱ्या जाण्याची शक्यता

बंगलोर, दि. २६ : आगामी सहा महिन्यात आयटी क्षेत्रातील ५० हजार जणांना घरी बसावे लागणार आहे. आर्थिक मंदीमुळे जगभरातच आयटी आणि बीपीओ क्षेत्रावर परिणाम झाला असून आयटीसंदर्भातील निर्यातही मंदावली आहे. त्यामुळे सहा महिन्यात या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात नोकर कपात होण्याची शक्यता आहे.
सप्टेंबर ते डिसेंबरदरम्यान आयटी आणि बीपीओ क्षेत्रातील मध्यम स्वरूपाच्या कंपन्यांनी दहा हजार जणांना घरी बसविण्याचा निर्णय घेतला होता. आता आर्थिक मंदीची झळ मोठ्या व लहान आयटी कंपन्यांनाही बसू लागेल व किमान ५० हजार जणांना नोकरी गमवावी लागेल, अशी शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे. मंदीची झळ पोहोचली असल्यामुळे आगामी काळात आयटी कंपन्या कर्मचाऱ्यांपुढे वेतन, भत्ते कपातीचा प्रस्ताव ठेवतील. मात्र, तेजीचे वातावरण निर्माण होईपर्यंत म्हणजेच किमान १२ ते १६ महिन्यांपर्यंत घरी बसण्याचा पर्याय आयटी प्रोफेशनल्स स्वीकारतील अशी शक्यताही व्यक्त केली जात आहे.

No comments: