Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 31 December, 2010

‘जेपीसी’चे सावटकायमच

लोकसभाध्यक्षांच्या बैठकीतही
-भाजप व सत्तारूढ नेत्यांशी मीराकुमार यांची चर्चा
-कोंडी ङ्गोडण्याची जबाबदारी सरकारचीच : भाजप

नवी दिल्ली, दि. ३० : २-जी स्पेक्ट्रम घोटाळ्यावरून संसदेत निर्माण झालेली कोंडी ङ्गोडण्याच्या आणि संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरळीत चालविण्याच्या उद्देशाने लोकसभा अध्यक्षा मीरा कुमार यांनी आज भाजप आणि सत्ताधारी नेत्यांशी चर्चा केली. तथापि ‘जेपीसी’च्या मागणीवरून माघार घेण्यास भाजपने स्पष्ट नकार दिला. संसदेची कोंडी ङ्गोडणे आता सरकारच्याच हातात असल्याचेही भाजपने स्पष्ट केले. यामुळे हिवाळी अधिवेशनाप्रमाणेच अर्थसंकल्पीय अधिवेशनावरही ‘जेपीसी’ मुद्याचे सावट कायम राहणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.
लोकसभेतील नेते प्रणव मुखर्जी, विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, संसदीय कामकाज मंत्री पवनकुमार बन्सल आणि राज्यमंत्री व्ही. नारायणस्वामी यांच्याशी मीरा कुमार यांनी चर्चा केली. २-जी स्पेक्ट्रम घोटाळ्यावरून संसदेच्या हिवाळी अधिवेशनात एकही दिवस कामकाज होऊ शकले नव्हते यावर चिंता व्यक्त करून मीरा कुमार यांनी ही बैठक बोलावली होती.
हिवाळी अधिवेशनाचा संपूर्ण कालावधी व्यर्थ गेला आहे आणि ही गंभीर व चिंतेची बाब आहे, असे मत भाजप आणि सत्तारूढ सदस्यांनी सुमारे दोन तास चाललेल्या या बैठकीत व्यक्त केले. त्याचवेळी आपापल्या भूमिकेवरून माघार घेण्यास दोन्ही बाजूंनी नकार दिला. स्पेक्ट्रम घोटाळ्याची चौकशी ‘जेपीसी’द्वारेच व्हायला हवी. ‘जेपीसी’पेक्षा आम्हाला कमीही नको आणि जास्तही नको, अशी भूमिका या बैठकीत सुषमा स्वराज यांनी विशद केली.
बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना मीरा कुमार यांनी सांगितले की, संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे कामकाज सुरळीत चालेल, असा विश्‍वास आता निर्माण झालेला आहे. दरम्यान, याच मुद्यावर मीरा कुमार उद्या शुक्रवारी भाजपेतर पक्षांच्या नेत्यांची भेट घेणार आहेत.
मीरा कुमार म्हणाल्या, आजच्या बैठकीत विरोधक आणि सत्ताधार्‍यांच्या मतात भिन्नता असली तरी अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरळीत चालण्यावर त्यांनी भर दिला आहे. तसे वचनही त्यांनी मला दिले आहे. यामुळे संसदेचे पुढील अधिवेशन गोंधळाविना पार पडेल, अशी आशा निर्माण झाली आहे.
जेपीसीवर भाजप ठाम
या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना भाजपच्या प्रवक्त्या निर्मला सीतारामन् यांनी सांगितले की, २-जी स्पेक्ट्रम घोटाळ्याची चौकशी केवळ संयुक्त संसदीय समितीमार्फतच करण्यात यावी, या मागणीवर भाजप ठाम आहे. या बैठकीत भाजपने आपली भूमिका मीरा कुमार यांना स्पष्टपणे कळविली आहे.

No comments: