Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 14 November, 2010

सालाझारशाहीचे गोव्यात कौतुक नकोच : काणेकर

'भारत स्वाभिमान'तर्फे पणजीत निषेध फेरी
पणजी, दि. १३ (प्रतिनिधी): भारतला महासत्ता बनवण्यासाठी प्रत्येक नागरिकाने आपला स्वाभिमान जागवण्याची नितांत गरज आहे. त्यासाठी सवड काढून काही वेळ देशसेवेसाठी देणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. पोर्तुगिजांच्या छळवादी राजवटीचा सामना करून व अपरिमित हालअपेष्टा सहन करून ज्यांनी गोव्याला मुक्त केले त्याच पोर्तुगिजांकडून आपल्या सालाझारशाही राजवटीचे उदात्तीकरण केले जात असताना त्यात सरकारने सहभागी होणे हे दुर्दैवी आहे, अशी खरमरीत टीका भारत स्वाभीमानचे गोवा प्रमुख डॉ. सुरज काणेकर यांनी केली.
भारत स्वाभिमान व देशप्रमी नागरिकांतर्फे आज पणजीत सरकारच्या कृतीचा निषेध करण्यासाठी मोर्चा काढण्यात आला होता. आझाद मैदानावर एकत्रित झालेल्या या नागरिकांनी आल्तिनो येथे पोर्तुगीज वकिलातीसमोर निदर्शने करून संताप व्यक्त केला. मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी या सोहळ्याला गैरहजेर राहून आपली भूमिका स्पष्ट केली. त्याच पद्धतीने राज्यपालांनीही आपली भूमिका स्पष्ट करावी, असे आवाहन त्यांनी केले.
योगगुरू बाबा रामदेव यांनी देशाला महसत्ता बनवण्यासाठी जो कार्यक्रम आखला आहे, त्याला सर्वांनी पाठिंबा द्यावा, असे आवाहन काणेकर यांनी केले. गोवा मुक्त होऊन पन्नास वर्षे झाली तरी अजूनही मये हा गाव मात्र पोर्तुगिजांच्या ताब्यात आहे,अशी खंत काशिनाथ मयेकर यांनी व्यक्त केली. मयेवासीय गेली पन्नास वर्षे लढत आहेत पण त्यांना अजूनही न्याय मिळत नाही, असेही ते म्हणाले. ही निषेध फेरी शहरातून फिरून आझाद मैदानावर नेण्यात आली व तेथे या कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

No comments: