नवी दिल्ली, दि. १९ : नितीन गडकरी यांच्या रुपाने पक्षाला लाभलेल्या नव्या नेतृत्वाला आम्हा सर्व पदाधिकाऱ्यांचा आशीर्वाद आहे आणि त्यांच्या नेतृत्वात पक्षासोबतच देेशाच्या विकासालाही बळ मिळेल, असा विश्वास पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी व्यक्त केला आहे.
गडकरी यांनी पक्षाची सूत्रे हाती घेतल्यानंतर लगेच ते पत्रकारांशी बोलत होते. अडवाणी म्हणाले, गडकरींचे नेतृत्व विकासाभिमुख आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवे त्याचे उत्तम उदाहरण आहे. हा हायवे आणि त्याच्या सडका या नेहमीसाठी
त्यांच्या कामाचे प्रतीक म्हणून नोंदल्या गेल्या आहेत. आज सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे देशाचा सर्वांगीण विकास आणि त्यासाठी लागणाऱ्या संसाधनांची उभारणी. आम्हाला जेव्हा आमची राज्ये हायवे, एक्सप्रेसवे बनवण्याचा प्रस्ताव द्यायचे तेव्हा आम्ही त्यांना सांगत असू, गडकरींची मदत घ्या.
मी १९४३ साली पहिल्यांदा संघाच्या ओटीसी प्रशिक्षणासाठी आलो, तेव्हा नागपूर केवळ दोनच गोष्टींसाठी प्रसिद्ध होेते. एक म्हणजे संत्रा आणि दुसरे म्हणजे आरएसएस. आज संपूर्ण नागपूरचा चेहरामोहरा बदलून गेला आहे. गडकरींचे नेतृत्व आणि मागदर्शनामुळेच हे शक्य झाले. गडकरींच्या नेतृत्वात आमचे सरकार आले तर आम्ही जनतेला उत्तम शासन देऊ आणि विकास करू, असे अडवाणी म्हणाले.
Sunday 20 December, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment